शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

आता बनावट बियाणे नियंत्रणासाठी मोहीम

By admin | Updated: May 11, 2015 23:56 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर ....

सतर्कता : कृषी आयुक्तांचे कृषी विकास अधिकाऱ्यांना निर्देशअमरावती : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर येतो. यंदा शासनाने बनावट बियाण्याची विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम उघडलेली दिसते. जिल्हास्तर, तालुकास्तरावर बनावट बियाण्यांचा छडा लावण्यासाठी पथके तयार करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. मागील वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. परंतु बियाण्यांची उगवण वेळीच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. कर्ज काढूनही शेतकरी संकटातून बाहेर पडू शकला नाही. यावेळी तसे होऊ नये, म्हणून शासन गंभीर दिसत आहे. बनावट बियाणे तयार करणारी यंत्रणा हंगामाच्या वेळी सक्रिय होते. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी बियाणे कंपन्यांवर असताना चुकीचा मार्ग अनुसरला जातो. दरवेळी काही विक्रेते पकडले जातात. बियाणे जप्त कले जाते. तरीही बेमुर्वतपणा संपत नाही. शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच बियाणे उत्पादकांनीसुद्धा हातभार लावावा. शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. यावर नियंत्रण ठेवणारी पथके व्हावी, त्यामुळे बनावट बियाणे करणाऱ्यांना धडा शिकविले जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तालुका समित्या कार्यरत असतानच केवळ हंगामात नाहीतर त्यांचे कार्य वर्षभर सुरू असते. फरक इतकाच की खरीप, रबी हंगामात शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये म्हणून अधिकची सतर्कता बाळगली जाते. यावेळीही आम्ही पूर्ण शक्तीनिशी यंत्रणा सज्ज केली आहे. बनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल कराबनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. शेतकऱ्यांच्या माथी चुकीचे बियाणे लादणाऱ्यांची मुळीच गय करु नका, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त कार्यालयाने सतर्कतेच्या सूचना दिल्या.बोगस बी-बियाणे विकण्याच्या प्रकारांना आळा घालणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. असा प्रकार करण्यावर प्रत्येक तालुकास्तरावर विशेष पथक तैनात आहे. असे प्रकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. -उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी