शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आता बँकाच शेतकऱ्यांचे तारणहार

By admin | Updated: July 25, 2015 00:08 IST

शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील बँकाच पीककर्ज देऊन शेतकऱ्यांना वाचवू शकतात.

किरण गीत्ते : तर शासकीय ठेवी काढू, ८६ टक्के कर्जाचे रुपांतरणअमरावती : शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील बँकाच पीककर्ज देऊन शेतकऱ्यांना वाचवू शकतात. सावकाराच्या दारात शेतकरी गेला तर ३ वर्षांत शेत हातचे जाईल. अशा स्थितीत बँकांनी पीककर्जाच्या उद्दिष्टांची लक्ष्यपूर्ती न केल्यास ‘त्या’ बँकांमधील शासकीय ठेवी काढून घेण्यात येतील. शासनाचे तसे आदेश आहेत, असे जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पीककर्ज वाटप आढावा सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, अमरावती जिल्ह्यात २ लाख २१ हजार ९४८ खातेदार शेतकऱ्यांना १६९५ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. २४ जूनपर्यंत १ लाख ३१ हजार ७४२ खातेदारांना १२०५ कोटी ६७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ७१ टक्के आहे. जिल्ह्यातील ४५ हजार १९६ खातेधारक शेतकरी ४०३ कोटी २१ लक्ष रुपयांच्या पीककर्ज रुपांतरणासाठी पात्र असताना २४ जुलै अखेर ३९ हजार ९४७ शेतकऱ्यांच्या ३४६ कोटी ३० लाख रुपयांचे रुपांतरण करण्यात आले आहे. ही टक्केवारी ८६ टक्के आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीककर्ज वाटपाची ७७ टक्के टक्केवारी असताना जिल्हा बँकेने मात्र ६० टक्केच कर्जवाटप केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामीण बँकांनी ७१ टक्के कर्जवाटप केले आहे. पीककर्ज वाटपाची टक्केवारी कमी असलेल्या बँकांना ३१ जुलैच्या आत टक्का सुधारावा.जिल्हा बँकेला फटकारजिल्हा बँकेने २४ जुलै अखेर ६० टक्केच कर्जवाटप केले. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला विचारणा केली तसेच १७ जून रोजी पीक विम्याचे ४९ कोटी रुपये जमा झाले असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. त्या बँकांवर कारवाईशेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी ३१ जुलै मुदत दिली आहे. या अवधीत ज्या बँकांचे वाटप ८० टक्क्यांपेक्षा कमी असेल, त्यांचा अहवाल कारवाईसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात येणार आहे. अशा सर्व बँकांमधील शासकीय ठेवी काढून घेण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.