शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता बँकाच शेतकऱ्यांचे तारणहार

By admin | Updated: July 25, 2015 00:08 IST

शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील बँकाच पीककर्ज देऊन शेतकऱ्यांना वाचवू शकतात.

किरण गीत्ते : तर शासकीय ठेवी काढू, ८६ टक्के कर्जाचे रुपांतरणअमरावती : शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्ह्यातील बँकाच पीककर्ज देऊन शेतकऱ्यांना वाचवू शकतात. सावकाराच्या दारात शेतकरी गेला तर ३ वर्षांत शेत हातचे जाईल. अशा स्थितीत बँकांनी पीककर्जाच्या उद्दिष्टांची लक्ष्यपूर्ती न केल्यास ‘त्या’ बँकांमधील शासकीय ठेवी काढून घेण्यात येतील. शासनाचे तसे आदेश आहेत, असे जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पीककर्ज वाटप आढावा सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, अमरावती जिल्ह्यात २ लाख २१ हजार ९४८ खातेदार शेतकऱ्यांना १६९५ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. २४ जूनपर्यंत १ लाख ३१ हजार ७४२ खातेदारांना १२०५ कोटी ६७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही टक्केवारी ७१ टक्के आहे. जिल्ह्यातील ४५ हजार १९६ खातेधारक शेतकरी ४०३ कोटी २१ लक्ष रुपयांच्या पीककर्ज रुपांतरणासाठी पात्र असताना २४ जुलै अखेर ३९ हजार ९४७ शेतकऱ्यांच्या ३४६ कोटी ३० लाख रुपयांचे रुपांतरण करण्यात आले आहे. ही टक्केवारी ८६ टक्के आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीककर्ज वाटपाची ७७ टक्के टक्केवारी असताना जिल्हा बँकेने मात्र ६० टक्केच कर्जवाटप केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामीण बँकांनी ७१ टक्के कर्जवाटप केले आहे. पीककर्ज वाटपाची टक्केवारी कमी असलेल्या बँकांना ३१ जुलैच्या आत टक्का सुधारावा.जिल्हा बँकेला फटकारजिल्हा बँकेने २४ जुलै अखेर ६० टक्केच कर्जवाटप केले. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला विचारणा केली तसेच १७ जून रोजी पीक विम्याचे ४९ कोटी रुपये जमा झाले असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. त्या बँकांवर कारवाईशेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी ३१ जुलै मुदत दिली आहे. या अवधीत ज्या बँकांचे वाटप ८० टक्क्यांपेक्षा कमी असेल, त्यांचा अहवाल कारवाईसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात येणार आहे. अशा सर्व बँकांमधील शासकीय ठेवी काढून घेण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.