शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभासाठी आता ५० व्यक्तींना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार लग्नसमारंभाला २५ जणांची उपस्थितीची घातलेली मर्यादा वाढवून ५० केली आहे. त्यामुळे वर, वधू, ...

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार लग्नसमारंभाला २५ जणांची उपस्थितीची घातलेली मर्यादा वाढवून ५० केली आहे. त्यामुळे वर, वधू, नातेवाईक, भटजी, आचारी व वाजंत्री आदीं मिळून ५० व्यक्तींना लग्नसमारंभासाठी उपस्थित राहता येईल. त्याशिवाय, विनावातानुकूलित मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये लग्नसमारंभ आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केलेत.

आता सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत लग्नसमारंभ आयोजित करता येईल. लग्नसमारंभ वर किंवा वधूचे घर, त्याचप्रमाणे, नॉन एसी मंगल कार्यालये, खुले लॉन, सभागृहात करता येईल. मात्र, एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ ५० व्यक्तीच उपस्थित असतील. वाजंत्री पथकाला केवळ लग्नस्थळीच वाद्य वाजविण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे, त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर व सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे. कुठेही नियमभंग आढळल्यास आयोजकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

बॉक्स

लेखी स्वरूपात परवानगी आवश्यक

लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींच्या यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधीकाऱ्यांनी दिले आहेत.