शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:17 IST

राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे.

अमरावती : राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे बांधल्याचे वनविभागाने नोटीशीद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमित धारकांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहे. राखीव वनक्षेत्र असल्याने शासन आदेशानुसार सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमित घरे हटविली जातील, असे नोटीशीत स्पष्ट नमूद आहे. नैसर्गिक न्यायाचा विचार करून स्वत:चे अतिक्रमण स्वत: काढण्यासाठी एक संधी दिली जात असून सात दिवसांत हटविण्यात आले नाही तर भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे नोटिसाद्वारे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी स्थानिक रहिवाशांना ‘अल्टिमेटम’ दिला आहे.संजय गांधीनगर हे वनजमिनींवर वसलेले असून गरीब, सामान्यांची नागरी वस्ती असल्याने ती रीतसर नियमित करून न्याय प्रदान करावा, अशी मागणी नगरसेवक अजय गोंडाणे यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. एवढेच नव्हे, तर आ. सुनील देशमुख यांनीदेखील शासनाकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवून संजय गांधीनगर क्रमांक २ या नागरी वस्तीला संरक्षण प्रदान करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.हजारापेक्षा अधिक घरेवनविभागाच्या नोंदी संजय गांधीनगरात अतिक्रमित २७९ एवढीच घरे असली तरी हजारपेक्षा अधिक घरे तेथे असतील, असा अंदाज आहे. या भागात बहुतांश गरीब, सामान्य, कामगार कुटुंब अधिक संख्येने वास्तव्यास आहेत.जिल्हाधिकाºयांना साकडेवनविभागाने सात दिवसांत घरे हटविण्याबाबत नोटिसा बजावताच गुरुवारी संजय गांधीनगर नं. २ येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना घरे वाचविण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले. जिल्हाधिकाºयांनी कैफियत ऐकली. याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला जाईल, असे त्यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले.रमाई आवास योजनेचा लाभसंजय गांधीनगरात लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईने अतिक्रमणासह घरकुलदेखील हटविले जातील.