शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:17 IST

राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे.

अमरावती : राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे बांधल्याचे वनविभागाने नोटीशीद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमित धारकांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहे. राखीव वनक्षेत्र असल्याने शासन आदेशानुसार सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमित घरे हटविली जातील, असे नोटीशीत स्पष्ट नमूद आहे. नैसर्गिक न्यायाचा विचार करून स्वत:चे अतिक्रमण स्वत: काढण्यासाठी एक संधी दिली जात असून सात दिवसांत हटविण्यात आले नाही तर भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे नोटिसाद्वारे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी स्थानिक रहिवाशांना ‘अल्टिमेटम’ दिला आहे.संजय गांधीनगर हे वनजमिनींवर वसलेले असून गरीब, सामान्यांची नागरी वस्ती असल्याने ती रीतसर नियमित करून न्याय प्रदान करावा, अशी मागणी नगरसेवक अजय गोंडाणे यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. एवढेच नव्हे, तर आ. सुनील देशमुख यांनीदेखील शासनाकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवून संजय गांधीनगर क्रमांक २ या नागरी वस्तीला संरक्षण प्रदान करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.हजारापेक्षा अधिक घरेवनविभागाच्या नोंदी संजय गांधीनगरात अतिक्रमित २७९ एवढीच घरे असली तरी हजारपेक्षा अधिक घरे तेथे असतील, असा अंदाज आहे. या भागात बहुतांश गरीब, सामान्य, कामगार कुटुंब अधिक संख्येने वास्तव्यास आहेत.जिल्हाधिकाºयांना साकडेवनविभागाने सात दिवसांत घरे हटविण्याबाबत नोटिसा बजावताच गुरुवारी संजय गांधीनगर नं. २ येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना घरे वाचविण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले. जिल्हाधिकाºयांनी कैफियत ऐकली. याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला जाईल, असे त्यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले.रमाई आवास योजनेचा लाभसंजय गांधीनगरात लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईने अतिक्रमणासह घरकुलदेखील हटविले जातील.