शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:17 IST

राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे.

अमरावती : राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. सन १९८२ पासून वनजमिनीवर मौजा वनखंड क्रमांक जुना १८६ सर्व्हे नंबर ८४, ‘क’ वर्ग राखीव वनजमिनींवर अतिक्रमण करून घरे बांधल्याचे वनविभागाने नोटीशीद्वारे म्हटले आहे. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ग, ई, फ, चा भंग केल्यामुळे संजय गांधीनगरात २७९ अतिक्रमित धारकांविरुद्ध यापूर्वीच वनगुन्हे दाखल झाले आहे. राखीव वनक्षेत्र असल्याने शासन आदेशानुसार सात दिवसांत घरे हटविण्यात यावीत, अन्यथा शासकीय बळाचा वापर करून नियमानुसार अतिक्रमित घरे हटविली जातील, असे नोटीशीत स्पष्ट नमूद आहे. नैसर्गिक न्यायाचा विचार करून स्वत:चे अतिक्रमण स्वत: काढण्यासाठी एक संधी दिली जात असून सात दिवसांत हटविण्यात आले नाही तर भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१ए) (बी) प्राप्त अधिकारान्वये सरकारजमा करण्याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे नोटिसाद्वारे वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी स्थानिक रहिवाशांना ‘अल्टिमेटम’ दिला आहे.संजय गांधीनगर हे वनजमिनींवर वसलेले असून गरीब, सामान्यांची नागरी वस्ती असल्याने ती रीतसर नियमित करून न्याय प्रदान करावा, अशी मागणी नगरसेवक अजय गोंडाणे यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली आहे. एवढेच नव्हे, तर आ. सुनील देशमुख यांनीदेखील शासनाकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवून संजय गांधीनगर क्रमांक २ या नागरी वस्तीला संरक्षण प्रदान करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.हजारापेक्षा अधिक घरेवनविभागाच्या नोंदी संजय गांधीनगरात अतिक्रमित २७९ एवढीच घरे असली तरी हजारपेक्षा अधिक घरे तेथे असतील, असा अंदाज आहे. या भागात बहुतांश गरीब, सामान्य, कामगार कुटुंब अधिक संख्येने वास्तव्यास आहेत.जिल्हाधिकाºयांना साकडेवनविभागाने सात दिवसांत घरे हटविण्याबाबत नोटिसा बजावताच गुरुवारी संजय गांधीनगर नं. २ येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना घरे वाचविण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले. जिल्हाधिकाºयांनी कैफियत ऐकली. याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला जाईल, असे त्यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले.रमाई आवास योजनेचा लाभसंजय गांधीनगरात लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईने अतिक्रमणासह घरकुलदेखील हटविले जातील.