शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘एसएमएस’च नाही, अपात्र कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : यंत्रणेची टाळाटाळ, टोकनधारकांचा काय दोष ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. शेतकरी अपात्र कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.शेतकऱ्यांना अनुदान देण्याविषयी सहकार विभागाने बुधवारी काढलेल्या पत्रकातील अटी-शर्तीनुसार तूर व हरभरा विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली व प्रत्यक्षात केंद्रावर खरेदी झाली नाही, त्या शेतकऱ्यांना १० क्विंटल प्रतिहेक्टर व दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजारांची मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांना विहिद मुदतीत एसएमएस पाठविण्यात आला व पूर्वी एक वेळा तूर केंद्रांवर विकली आहे तसेच एसएमएस पाठविल्यानंतरही तूर विक्रिसाठी आणली नाही, ते शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचे निर्देश आहेत. पोर्टलवर नोंदणी केलेल्या व तूर खरेदीसाठी एसएमएस न आलेल्या शेतकरी अनुदानासाठी पात्र, पोर्टलवर लागवडीखालील क्षेत्राच्या माहितीची नोंद चुकीची झाली, अशा प्रकरणी क्षेत्राची खातरजमा करून अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यंदा तुरीसाठी ३६ हजार ६९९ व हरभऱ्यांसाठी २३ हजार ७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी अभावी घरीच पडून आहे. १५ मेपासून तूर तर १३ जूनपासून हरभऱ्यांची शासकीय खरेदी बंद करण्यात आली. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. त्यामुळे या शेतकºयांना आता प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. मात्र, अटी व शर्तींचे जाचक निकष व खरेदीदार यंत्रणेच्या घोळात अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.खरेदीदार यंत्रणेचा भोंगळ कारभारच दोषीजिल्ह्यातील नऊ केंद्रावर ‘डीएमओ’, तर तीन केंद्रावर ‘व्हीसीएमएफ’द्वारा तूर व हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. संबंधित तालुक्यातील खरेदी-विक्री संघांद्वारा ही प्रक्रिया हाताळण्यात आली. अनेक केंद्रांच्या ठिकाणी ‘एसएमएस’ची सुविधा नाही. ज्या ठिकाणी आहे, तेथे तांत्रिक दोषामुळे शेतकºयांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ आले नसल्यामुळेच त्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही. यामध्ये शेतकरी अपात्र कसा, अशी विचारणा केली जात आहे.खरेदी-विक्री संघातच झाला घोळतूर, हरभरा खरेदीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ किंवा फोन करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी-विक्री संघाकडे होती. नेमका याच ठिकाणी घोळ झाला आहे. रजिस्टरवर कोऱ्या जागा सोडणे, ज्याचा क्रमांक आहे - त्याच्याऐवजी निकटस्थांना लाभ देणे आदी प्रकार झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये अमरावती खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक व कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. या सर्व प्रकारात शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.