शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

‘एसएमएस’च नाही, अपात्र कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : यंत्रणेची टाळाटाळ, टोकनधारकांचा काय दोष ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. शेतकरी अपात्र कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.शेतकऱ्यांना अनुदान देण्याविषयी सहकार विभागाने बुधवारी काढलेल्या पत्रकातील अटी-शर्तीनुसार तूर व हरभरा विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली व प्रत्यक्षात केंद्रावर खरेदी झाली नाही, त्या शेतकऱ्यांना १० क्विंटल प्रतिहेक्टर व दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजारांची मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांना विहिद मुदतीत एसएमएस पाठविण्यात आला व पूर्वी एक वेळा तूर केंद्रांवर विकली आहे तसेच एसएमएस पाठविल्यानंतरही तूर विक्रिसाठी आणली नाही, ते शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचे निर्देश आहेत. पोर्टलवर नोंदणी केलेल्या व तूर खरेदीसाठी एसएमएस न आलेल्या शेतकरी अनुदानासाठी पात्र, पोर्टलवर लागवडीखालील क्षेत्राच्या माहितीची नोंद चुकीची झाली, अशा प्रकरणी क्षेत्राची खातरजमा करून अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यंदा तुरीसाठी ३६ हजार ६९९ व हरभऱ्यांसाठी २३ हजार ७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी अभावी घरीच पडून आहे. १५ मेपासून तूर तर १३ जूनपासून हरभऱ्यांची शासकीय खरेदी बंद करण्यात आली. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. त्यामुळे या शेतकºयांना आता प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. मात्र, अटी व शर्तींचे जाचक निकष व खरेदीदार यंत्रणेच्या घोळात अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.खरेदीदार यंत्रणेचा भोंगळ कारभारच दोषीजिल्ह्यातील नऊ केंद्रावर ‘डीएमओ’, तर तीन केंद्रावर ‘व्हीसीएमएफ’द्वारा तूर व हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. संबंधित तालुक्यातील खरेदी-विक्री संघांद्वारा ही प्रक्रिया हाताळण्यात आली. अनेक केंद्रांच्या ठिकाणी ‘एसएमएस’ची सुविधा नाही. ज्या ठिकाणी आहे, तेथे तांत्रिक दोषामुळे शेतकºयांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ आले नसल्यामुळेच त्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही. यामध्ये शेतकरी अपात्र कसा, अशी विचारणा केली जात आहे.खरेदी-विक्री संघातच झाला घोळतूर, हरभरा खरेदीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ किंवा फोन करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी-विक्री संघाकडे होती. नेमका याच ठिकाणी घोळ झाला आहे. रजिस्टरवर कोऱ्या जागा सोडणे, ज्याचा क्रमांक आहे - त्याच्याऐवजी निकटस्थांना लाभ देणे आदी प्रकार झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये अमरावती खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक व कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. या सर्व प्रकारात शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.