शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

‘एसएमएस’च नाही, अपात्र कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : यंत्रणेची टाळाटाळ, टोकनधारकांचा काय दोष ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावरून शेतकऱ्यांना नियमित एसएमएस पाठविण्यात आलेले नाही. अनेकदा फोनद्वारेच सांगण्यात आले असल्याने यातही हेराफेरी झाली. शेतकरी अपात्र कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.शेतकऱ्यांना अनुदान देण्याविषयी सहकार विभागाने बुधवारी काढलेल्या पत्रकातील अटी-शर्तीनुसार तूर व हरभरा विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली व प्रत्यक्षात केंद्रावर खरेदी झाली नाही, त्या शेतकऱ्यांना १० क्विंटल प्रतिहेक्टर व दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजारांची मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकºयांना विहिद मुदतीत एसएमएस पाठविण्यात आला व पूर्वी एक वेळा तूर केंद्रांवर विकली आहे तसेच एसएमएस पाठविल्यानंतरही तूर विक्रिसाठी आणली नाही, ते शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचे निर्देश आहेत. पोर्टलवर नोंदणी केलेल्या व तूर खरेदीसाठी एसएमएस न आलेल्या शेतकरी अनुदानासाठी पात्र, पोर्टलवर लागवडीखालील क्षेत्राच्या माहितीची नोंद चुकीची झाली, अशा प्रकरणी क्षेत्राची खातरजमा करून अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यंदा तुरीसाठी ३६ हजार ६९९ व हरभऱ्यांसाठी २३ हजार ७९२ आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी अभावी घरीच पडून आहे. १५ मेपासून तूर तर १३ जूनपासून हरभऱ्यांची शासकीय खरेदी बंद करण्यात आली. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या किमान ६० हजार शेतकऱ्यांचा तूर व हरभरा अद्याप खरेदी करायचा आहे. त्यामुळे या शेतकºयांना आता प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान शासन देणार आहे. मात्र, अटी व शर्तींचे जाचक निकष व खरेदीदार यंत्रणेच्या घोळात अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.खरेदीदार यंत्रणेचा भोंगळ कारभारच दोषीजिल्ह्यातील नऊ केंद्रावर ‘डीएमओ’, तर तीन केंद्रावर ‘व्हीसीएमएफ’द्वारा तूर व हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. संबंधित तालुक्यातील खरेदी-विक्री संघांद्वारा ही प्रक्रिया हाताळण्यात आली. अनेक केंद्रांच्या ठिकाणी ‘एसएमएस’ची सुविधा नाही. ज्या ठिकाणी आहे, तेथे तांत्रिक दोषामुळे शेतकºयांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ आले नसल्यामुळेच त्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही. यामध्ये शेतकरी अपात्र कसा, अशी विचारणा केली जात आहे.खरेदी-विक्री संघातच झाला घोळतूर, हरभरा खरेदीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ किंवा फोन करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी-विक्री संघाकडे होती. नेमका याच ठिकाणी घोळ झाला आहे. रजिस्टरवर कोऱ्या जागा सोडणे, ज्याचा क्रमांक आहे - त्याच्याऐवजी निकटस्थांना लाभ देणे आदी प्रकार झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चौकशीचे आदेश दिलेत. यामध्ये अमरावती खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक व कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. या सर्व प्रकारात शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.