शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत १३२ उमेदवारांचे नामाकंन बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर एकूण १२ हजार ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर एकूण १२ हजार ५९३ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत छाननी करण्यात आली. यामध्ये १४ तालुक्यांतून १३२ अर्ज बाद झाले, तर १२ हजार ४६१ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

गत एप्रिल ते डिसेंबर या महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आली. १२ हजार ५९३ अर्जांमधून १२ हजार ४६१ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले.

बॉक्स

४ जानेवारीला उमेदवार यादी होणार प्रसिद्ध

जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ४ नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यकता असल्यास १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे.

बॉक्स

तालुकानिहाय बाद अर्ज

तालुका दाखल अर्ज बाद अर्ज

अमरावती १०७४ ११

भातकुली ७७२ ०४

तिवसा ६६८ ०१

दर्यापूर १२४४ १३

मोशी ९०० २०

वरूड ९९७ ०२

अंजनगाव ९०२ १३

अचलपूर ९७२ १५

धारणी ८५९ १५

चिखलदरा ५२५ १८

नांदगाव खं ९९९ ०७

चांदूर रेल्वे ५७८ ०३

चांदूर बाजार ९१५ ०१

धामणगाव ११७८ ०९