शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वसतिगृहात नाही पाणी नाही, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपायुक्तांच्या दालनाच ठिय्या

By उज्वल भालेकर | Updated: December 12, 2023 20:40 IST

२०११ च्या शासननिर्णयानूसार वसतिगृहात सुविधा नसल्याचा आरोप.

अमरावती : शहरातील सोनल कॉलनी परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये असलेल्या आदिवासी वसतिगृहात मागील चार दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार, आवश्यक सोयी-सुविधाही वसतिगृहात मिळत नाहीत. त्यामुळे संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे धडक देत उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे; परंतु शहरातील आदिवासी वसतिगृहाची स्वत:ची इमारत नसून भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतिगृहे आहेत. या वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मागील चार दिवसांपासून सोनल कॉलनी येथील वसतिगृहात पिण्याच्या पाण्याबरोबरच दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील वसतिगृहातील वॉर्डन १५ दिवसांपासून वसतिगृहात आलेले नाहीत. तसेच वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक कॉम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी विकास विभाग उपायुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपायुक्त जागृती कुमरे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती