शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

वसतिगृहात नाही पाणी नाही, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपायुक्तांच्या दालनाच ठिय्या

By उज्वल भालेकर | Updated: December 12, 2023 20:40 IST

२०११ च्या शासननिर्णयानूसार वसतिगृहात सुविधा नसल्याचा आरोप.

अमरावती : शहरातील सोनल कॉलनी परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये असलेल्या आदिवासी वसतिगृहात मागील चार दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार, आवश्यक सोयी-सुविधाही वसतिगृहात मिळत नाहीत. त्यामुळे संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे धडक देत उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे; परंतु शहरातील आदिवासी वसतिगृहाची स्वत:ची इमारत नसून भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतिगृहे आहेत. या वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मागील चार दिवसांपासून सोनल कॉलनी येथील वसतिगृहात पिण्याच्या पाण्याबरोबरच दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील वसतिगृहातील वॉर्डन १५ दिवसांपासून वसतिगृहात आलेले नाहीत. तसेच वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक कॉम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी विकास विभाग उपायुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपायुक्त जागृती कुमरे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती