शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ना शाळा, ना परीक्षा; ५ लाख ११ हजार विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

पान २ साठी कोरोनाची देण : ऐतिहासिकच ठरले शैक्षणिक वर्ष, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचाही मार्ग झाला मोकळा अमरावती : विद्यार्थ्यांना दरवर्षी ...

पान २ साठी

कोरोनाची देण : ऐतिहासिकच ठरले शैक्षणिक वर्ष, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचाही मार्ग झाला मोकळा

अमरावती : विद्यार्थ्यांना दरवर्षी नियमित शाळेत जाऊन दिलेला गृहपाठ पूर्ण करावा लागयचा. यासोबतच चाचणी, सहामाही आणि वार्षिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच वरच्या वर्गात प्रवेश मिळायचा. पण, कोरोनाकोपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न जाता, परीक्षा न देताही उत्तीर्ण होण्याची संधी मिळाली. यावर्षी पहिली ते बारावीपर्यंतचे तब्बल ५ लाख ११ हजार १२६ विद्यार्थी वर्गोन्नत झाले असून २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष त्यादृष्टीने ऐतिहासिकच ठरले आहेत.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगीच्या एकूण २ हजार ८९४ शाळा असून, या शाळांमध्ये सध्या ५ लाख ११ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांचे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष घरीच गेले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ते शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावे, याकरिता ऑनलाइन शिक्षणाचा आधार घेण्यात आला. परंतु, ऑनलाइन शिक्षण फारसे काही उपयुक्त ठरले नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार प्रारंभी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केले होते. मात्र, कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर तेही बंद करण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तर एकही दिवस शाळेत पाय ठेवला नाही.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे आरोग्य जास्त महत्त्वाचे असल्याने त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी आता उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात गेले आहेत.

--------------

बॉक्स

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळा, शिक्षक बघितलेच नाही

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने शाळाही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाता आले नाही आणि शिक्षकांना भेटता आले आहे. यावर्षी पहिलीमध्ये असलेले ४० हजार ३६५ विद्यार्थी आणि दुसरीतील ४३ हजार ७५४ विद्यार्थी यांनी प्रवेश घेतला पण, अद्यापही शाळेत पाऊल टाकले नाही. त्यांना आपले शिक्षक कोण, त्यांचे नाव काय, याचा पत्ताच नाही. इतकेच काय, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची तोंडओळख झालेली नाहीत. आता यावषीर्ही शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शंकाच आहे.

-------------

बॉक्स

अशी आहेत विद्यार्थी

खासगी अनुदानित शाळा : २५७६५९

खासगी विनाअनुदानित शाळा : १०५४०५

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी : ५१११२६

--------------

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शाळा: २८९४

जिल्हा परिषदेच्या शाळा १५८५