शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

रेल्वे फुल्ल, मुंबई, पुण्यासाठी आरक्षण मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

(असायमेंट) अमरावती : हल्ली सण, उत्सवाचे दिवस असल्याने रेल्वे गाड्या फुल्ल धावत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ‘नो रूम’ आरक्षण खिडक्यांवर ...

(असायमेंट)

अमरावती : हल्ली सण, उत्सवाचे दिवस असल्याने रेल्वे गाड्या फुल्ल धावत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ‘नो रूम’ आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. विशेषत: पुणे, मुंबई मार्गे सर्वच रेल्वे गाड्यात चिक्कार गर्दी असून, आरक्षणाविना ‘नो एन्ट्री’मुळे प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. पुढे दिवाळी उत्सवातही रेल्वेमध्ये हीच स्थिती असेल, असे संकेत आहेत.

------------------

मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना!

- मुंबई, पुणे येथे नोकरी, व्यवसायानिमित्त असलेल्यांना आता गौरी, गणपती उत्सवासाठी घर गाठायचे आहे. तथापि, रेल्वे फुल्लचा फटका बसत आहे.

- रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्यामुळे ट्रॅव्हल्स संचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी चालविली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई येथून विदर्भात परतणाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

- रेल्वेचा प्रवास सुरक्षित असल्याने अन्य वाहनांनी मुंबई, पुणे येथून प्रवास नाही, अशी अनेकांची धारणा आहे. परिणामी रेल्वेचे आरक्षण नसल्याने अनेकांनी घरी येणे टाळले आहे.

----------------------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

नागपूर-पुणे गरीब रथ

हावडा-मुंबई गितांजली मेल

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस

गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस

-------------------

हैद्राबाद मार्गावर गर्दी कमीच

पुणे, मुंबई मार्गावर रेल्वे फुल्ल असताना हैद्राबाद, तिरूपती मार्गे रेल्वेत गर्दी नगण्य आहे. कोरोनामुळे मंदिरे बंद असल्यामुळे तिरूपती देवस्थानात ये-जा करण्याऱ्या भक्तांची गर्दी ओसरली आहे. परिणामी अहमदाबाद-चेन्नै एक्स्प्रेस, अमरावती-तिरूपती एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी कमीच आहे.

-----------------

ना मास्क, ना शारीरिक अंतर

१) गणेशोत्सवात रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढल्याने बहुुतांश प्रवाशी मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. फलाटावर रेटारेटी ही अलीकडे नित्याचीच बाब झाली आहे.

२) कोरोनाची तिसरी लाट सीमेवर असताना रेल्वे फलाटावर, बोगीत नागरिक सैराट झाल्यासारखे वागत आहेत. ना मास्क, ना शारीरिक अंतर यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती आहे.

३) रेल्वेत गर्दी वाढली. कोरोना संपला अशा अविर्भावात नागरिक वागत आहेत. सण, उत्सवात कोरोनाचा उद्रेक झाला, तर नियमावलींना बगल दिली, हेच कारण पुढे येईल.

४) रेल्वेत खाद्यपदार्थही उघड्यावर विकले जात आहेत. रेल्वे प्रशासन, पोलिसांकडून कोरोना नियमावलीचे पालन होण्यासाठी कठोर पावले उचलली जात नाही.