शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

धुमसणारे शहर अन् पोलीस आयुक्तांचा 'नो रिप्लाय'

By admin | Updated: November 6, 2014 22:46 IST

अविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर

गणेश देशमुख - अमरावतीअविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे शांततेचे आवाहन करून सुरक्षिततेची हमी द्यायला हवी होती; तथापि त्यांनी हे महत्त्वाचे कर्तव्य टाळले. बुधवारी जे घडले त्याची वार्ता शहरभरात वाऱ्यासारखी पसरली. काय घडले हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. दस्तुरनगर, यशोदानगर, मोतीनगर, राजापेठ अशा जवळपासच्या भागातील अनेक मंडळी घटनास्थळी पोहोचली. घटना घडून तीन तास उलटले तरी आत्ताच घटना घडली असावी, अशा स्वरुपाची मोठी गर्दी दस्तुरनगर आणि यशोदानगर चौरस्त्यावर बुधवारी बघता येत होती. जी मंडळी घटनास्थळी जाऊ शकली नाही किंवा जाण्याच्या भानगडीत ज्यांना पडायचे नव्हते, अशा तमाम मंडळींनाही नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे होते. घरातील महिला, मुली यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने वास्तव अवगत करून घ्यावयाचे होते. अंबानगरीने यापूर्वी अशाच घटनांचे गंभीर पडसाद अनुभवले असल्यामुळे यावेळीही सामान्यांच्या काळजात अनामिक हुरहुर होती. वास्तवाची माहिती आणि सुरक्षिततेची हमी सर्वांना हवी होती. बुधवारी सुमारे पाच वाजता घडलेल्या या घटनेनंतर फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्राईम ब्रान्च, क्यूआरटी आणि चार्ली कमांडोज् पोहोचले. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रियाजुद्दीन देशमुख आणि क्राईम ब्रान्चचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी कुशलतेने स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेनंतर अनेक तास रस्त्यावर गर्दी असली तरीही पुन्हा अघटीत घडणार नाही याची दक्षता बाळगण्यात हे दोन्ही अधिकारी यशस्वी ठरलेत. घटनास्थळी स्थिती नियंत्रणात आलेली असताना शहरभरात मात्र अफवा आणि चर्चांना उधाण येऊ लागले. चौकाचौकांत, दुकानांवर, पानटपऱ्यांवर, गल्ली-मोहल्ल्यांत चर्चा होत्या त्या केवळ दसुतुरनगरातील हिंसेच्याच. ज्याला जे कळले, त्याने ते सांगितले. भयंकर घटना सांगताना त्यातील 'भयंकरपणा' वाढतच गेला. सामान्यांची मने भयभीत झाली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात चौकशी होऊ लागली. 'आमचे घर तिकडेच आहे, त्या रस्त्याने आता जावे की नाही', असले प्रश्न आम्हाला विचारले जाऊ लागले.