शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

धुमसणारे शहर अन् पोलीस आयुक्तांचा 'नो रिप्लाय'

By admin | Updated: November 6, 2014 22:46 IST

अविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर

गणेश देशमुख - अमरावतीअविचारी तरुणांच्या एका जत्थ्याने केलेल्या गोटमार, लूटमार आणि मारहाणीनंतर बुधवारी अवघ्या शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. नागरिक अनामिक दहशतीत वावरत होते. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे शांततेचे आवाहन करून सुरक्षिततेची हमी द्यायला हवी होती; तथापि त्यांनी हे महत्त्वाचे कर्तव्य टाळले. बुधवारी जे घडले त्याची वार्ता शहरभरात वाऱ्यासारखी पसरली. काय घडले हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. दस्तुरनगर, यशोदानगर, मोतीनगर, राजापेठ अशा जवळपासच्या भागातील अनेक मंडळी घटनास्थळी पोहोचली. घटना घडून तीन तास उलटले तरी आत्ताच घटना घडली असावी, अशा स्वरुपाची मोठी गर्दी दस्तुरनगर आणि यशोदानगर चौरस्त्यावर बुधवारी बघता येत होती. जी मंडळी घटनास्थळी जाऊ शकली नाही किंवा जाण्याच्या भानगडीत ज्यांना पडायचे नव्हते, अशा तमाम मंडळींनाही नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे होते. घरातील महिला, मुली यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने वास्तव अवगत करून घ्यावयाचे होते. अंबानगरीने यापूर्वी अशाच घटनांचे गंभीर पडसाद अनुभवले असल्यामुळे यावेळीही सामान्यांच्या काळजात अनामिक हुरहुर होती. वास्तवाची माहिती आणि सुरक्षिततेची हमी सर्वांना हवी होती. बुधवारी सुमारे पाच वाजता घडलेल्या या घटनेनंतर फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्राईम ब्रान्च, क्यूआरटी आणि चार्ली कमांडोज् पोहोचले. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रियाजुद्दीन देशमुख आणि क्राईम ब्रान्चचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी कुशलतेने स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेनंतर अनेक तास रस्त्यावर गर्दी असली तरीही पुन्हा अघटीत घडणार नाही याची दक्षता बाळगण्यात हे दोन्ही अधिकारी यशस्वी ठरलेत. घटनास्थळी स्थिती नियंत्रणात आलेली असताना शहरभरात मात्र अफवा आणि चर्चांना उधाण येऊ लागले. चौकाचौकांत, दुकानांवर, पानटपऱ्यांवर, गल्ली-मोहल्ल्यांत चर्चा होत्या त्या केवळ दसुतुरनगरातील हिंसेच्याच. ज्याला जे कळले, त्याने ते सांगितले. भयंकर घटना सांगताना त्यातील 'भयंकरपणा' वाढतच गेला. सामान्यांची मने भयभीत झाली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात चौकशी होऊ लागली. 'आमचे घर तिकडेच आहे, त्या रस्त्याने आता जावे की नाही', असले प्रश्न आम्हाला विचारले जाऊ लागले.