शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे ना नियोजन, ना बैठकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

वनमंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नावाने वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवड जून महिन्यात करण्याचे नियोजन होते. फेबु्रवारीमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वन विभागासह अन्य यंत्रणांची बैठक घेऊन यावर्षीचे वृक्षलागवडीचे 'टार्गेट' निश्चित केले होते.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : निधीचा अभाव, जिल्ह्यात १६ लाख रोपांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युती सरकारच्या काळात चार वर्षांत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठले आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे जून उजाडला असताना वृक्ष लागवडीबाबत जिल्हास्तरावर ना नियोजन, ना बैठकी, असे चित्र आहे. त्यामुळे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार की नाही, यासंदर्भात संभ्रम आहे.वनमंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नावाने वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवड जून महिन्यात करण्याचे नियोजन होते. फेबु्रवारीमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वन विभागासह अन्य यंत्रणांची बैठक घेऊन यावर्षीचे वृक्षलागवडीचे 'टार्गेट' निश्चित केले होते. परंतु, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर आजपर्यंत वृक्षलागवडीबाबत ना नियोजन, ना बैठकी असा जिल्हा प्रशासनाचा कारभार सुरू आहे. ४ मे २०२० रोजी शासनाने नवीन योजना, उपक्रम, विविध कार्यक्रमांच्या निधीवर कात्री लावली आहे. दुसरीकडे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार असल्याने वनविभागाच्या नर्सरीत १६ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.रोपांचे संगोपन, निगा राखणे, देखभाल करण्याकरिता मोठी रक्कम खर्च होत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात गतवर्षी १ कोटी ११ लाख वृक्षलागवडीचे 'टार्गेट' होते. किंबहुना १ कोटी १२ लाख वृक्षलागवडीची किमया प्रशासकीय यंत्रणांनी केली होती. यंदा वृक्ष लागवडीसाठी निधीची तरतूद नसल्याने वनविभागाचे अधिकारी ठोस निर्णय घेऊ शकले नाहीत. वृक्षलागवडीबाबत वनविभागाला शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.जिल्हा परिषदेत ‘नरेगा’तून वृक्षलागवडजिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षी नरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. नरेगा अंतर्गत वृक्षलागवडीद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हा परिषद त्यांच्या खुल्या जागा, इमारत परिसर, शाळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने १६ लाख रोपे तयार आहेत. मात्र, यंदा वृक्ष लागवड कधीपासून होणार, याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. वन विभाग ‘कॅम्पा’ योजनेतून वृक्ष लागवड करणार आहे.- गजेंद्र नरवणे,उपवनसंरक्षक, अमरावती.

 

टॅग्स :Natureनिसर्ग