शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

वृक्ष लागवडीचे ना नियोजन, ना बैठकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

वनमंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नावाने वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवड जून महिन्यात करण्याचे नियोजन होते. फेबु्रवारीमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वन विभागासह अन्य यंत्रणांची बैठक घेऊन यावर्षीचे वृक्षलागवडीचे 'टार्गेट' निश्चित केले होते.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : निधीचा अभाव, जिल्ह्यात १६ लाख रोपांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युती सरकारच्या काळात चार वर्षांत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठले आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे जून उजाडला असताना वृक्ष लागवडीबाबत जिल्हास्तरावर ना नियोजन, ना बैठकी, असे चित्र आहे. त्यामुळे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार की नाही, यासंदर्भात संभ्रम आहे.वनमंत्री संजय राठोड यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नावाने वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात २६ लाख वृक्ष लागवड जून महिन्यात करण्याचे नियोजन होते. फेबु्रवारीमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वन विभागासह अन्य यंत्रणांची बैठक घेऊन यावर्षीचे वृक्षलागवडीचे 'टार्गेट' निश्चित केले होते. परंतु, २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर आजपर्यंत वृक्षलागवडीबाबत ना नियोजन, ना बैठकी असा जिल्हा प्रशासनाचा कारभार सुरू आहे. ४ मे २०२० रोजी शासनाने नवीन योजना, उपक्रम, विविध कार्यक्रमांच्या निधीवर कात्री लावली आहे. दुसरीकडे वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार असल्याने वनविभागाच्या नर्सरीत १६ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.रोपांचे संगोपन, निगा राखणे, देखभाल करण्याकरिता मोठी रक्कम खर्च होत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात गतवर्षी १ कोटी ११ लाख वृक्षलागवडीचे 'टार्गेट' होते. किंबहुना १ कोटी १२ लाख वृक्षलागवडीची किमया प्रशासकीय यंत्रणांनी केली होती. यंदा वृक्ष लागवडीसाठी निधीची तरतूद नसल्याने वनविभागाचे अधिकारी ठोस निर्णय घेऊ शकले नाहीत. वृक्षलागवडीबाबत वनविभागाला शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.जिल्हा परिषदेत ‘नरेगा’तून वृक्षलागवडजिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षी नरेगा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. नरेगा अंतर्गत वृक्षलागवडीद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्हा परिषद त्यांच्या खुल्या जागा, इमारत परिसर, शाळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने १६ लाख रोपे तयार आहेत. मात्र, यंदा वृक्ष लागवड कधीपासून होणार, याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. वन विभाग ‘कॅम्पा’ योजनेतून वृक्ष लागवड करणार आहे.- गजेंद्र नरवणे,उपवनसंरक्षक, अमरावती.

 

टॅग्स :Natureनिसर्ग