शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही नाही राहणार उपाशी; शिधापत्रिकाधारकांना धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; नियमित आणि मोफत कार्डधारकांना दिलासा अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; नियमित आणि मोफत कार्डधारकांना दिलासा

अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटविण्याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात जिल्ह्यातील १९ लाख ४० हजार ५७८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड, तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक

१९४०५७८

प्राधान्यगट- २८५७८२

अंत्योदय -१२१८४४

केसरी ८००२८

बॉक्स

काय मिळणार?

प्रतिमानसी

३ किलो गहू

२ किलो तांदूळ

बीपीएलच्या -२८५७८२

सदस्यांना लाभ

१)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू १० किलो तांदूळ अशी एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड

२)प्राधान्यक्रम कुटुंबे योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलोप्रति लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले आहे.

बॉक्स

केसरीच्या ४०६८५० लाभार्थ्यांना मिळणार लाभ

केसरीकार्ड असलेल्यांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता सर्व कार्डधारकांना मोफत धान्य लाभ होणार आहे.

कोट

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या मे २०२० च्या अन्नधान्याची मोफत वाटप करण्याच्या घोषणेनुसार. जिल्ह्यातील सुमारे १९ लाखावर लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.

- अनिल टाकसाळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी