शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

कर्जवाटपास बँकांची ना

By admin | Updated: July 7, 2017 00:15 IST

अडचणीतील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासन हमीवर शेतकऱ्यांना तातडीने १० हजाराचे कर्जवाटप करण्याचे

तातडीचे १० हजाराचे कर्ज : तीन लाख शेतकऱ्यांसमोर नवे संकट लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अडचणीतील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासन हमीवर शेतकऱ्यांना तातडीने १० हजाराचे कर्जवाटप करण्याचे निर्देश यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी बँकर्सची बैठक घेऊन पुन्हा बँकाना निक्षून बजावले. मात्र, जिल्ह्यातील एकाही बँकेने शेतकऱ्यांना कर्ज दिले नसल्याने बँका शासन व प्रशासनाला जुमानत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी शेतकरी थकबाकीदार असल्याने बँकांच्या धोरणानुसार त्यांना कर्ज मिळू शकत नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात अर्थसहाय्य मिळावे, यासाठी ३० जून २०१२ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजाराच्या मर्यादेत शासनहमीवर तातडीचे कर्ज देण्याचे निर्देश १४ जून रोजी शासनाने दिले. जाहीर निकषात काही सुधारणा करून २० जून रोजी सुधारित आदेश दिलेत. याविषयीचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले. मात्र, एकाही बँकेने एकाही शेतकऱ्याला तातडीचे १० हजाराचे कर्ज दिलेले नाही. बँका जुमानत नसल्याने पालकमंत्र्याच्या निर्देशाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्ह्यातील खरीप पीककर्ज वाटप व तातडीचे १० हजाराच्या कर्जवाटपाचा आढावा घेण्यासाठी १ जून रोजी सभा आयोजित केली होती. एसएलबीसीचे निर्देश नाहीत ४तातडीच्या कर्जवाटपाचे शासनादेश असले तरी राष्ट्रीयीकृत बँकांना राज्यस्तरीय बँकर्स समितीचे (एसएलबीसी) निर्देश नाहीत. यासंदर्भात आरबीआयसोबत संपर्क सुरू असला तरी अद्याप बँकांना सूचना नसल्यामुळे याबँकानी कर्जवाटप सुरू केलेले नाही. जिल्हा बँकेद्वारा शिखर बँकेकडे कर्जाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, व्याज दर ८.७५ टक्के असल्यामुळे प्रस्ताव रखडला असल्याने तातडीचे कर्जवाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेले नाही. तीन लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो लाभ ४जिल्ह्यात तातडीच्या कर्जासाठी किमान तीन लाख शेतकरी पात्र आहेत. यामध्ये १ लाख ६७ हजार थकबाकीदार, एक लाख सहा हजार नवे खातेदार तर ४३ हजार शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केल्याने ते देखील १० हजारांच्या कर्जास पात्र ठरले आहेत. यापैकी एकाही शेतकऱ्याला बँकेने कर्ज दिले नाही. कर्जमाफीची व्याप्ती वाढली, दीड लाख शेतकरी पात्र अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती शासनाने आता २००९ ते २०१६ अशी वाढविल्याने जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकरी यामध्ये समाविष्ट झाले आहेत. मात्र, शासनाच्या निकषांनुसार यातील किमान दीड लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. शासनाने २८ जूनच्या निर्णयाप्रमाणे एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये सुधारणा करून व्याप्ती वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचे ३५ हजार ८३३ शेतकरी, राष्ट्रीयीकृत बँकेचे एक लाख ३१ हजार ९१ तर ग्रामीण बँकेचे ५०२, अशा एकूण एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तातडीच्या कर्जवाटपासंर्दभात आरबीआयकडून अद्याप कुठलेच निर्देश नसल्याने कर्जवाटप करण्यात आलेले नाही. कर्जवाटपासाठी प्रशासनाचा वाढता दबाव असल्याने कळविले आहे.सूचनेची प्रतीक्षा आहे. - जितेंद्र झा, व्यवस्थापक, अग्रणी बँक तातडीच्या कर्जवाटपासाठी जिल्हा बँकेला पत्र देण्यात आले. प्रत्यक्ष बोलून सूचना देण्यात आल्यात. अद्याप शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू झाले नाही. लवकरच कर्जवाटप सुरू करण्यात येईल - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक