शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

ना खांदेकरी, ना विधीचे सोपस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST

अमरावती : गत वर्षापासून कोरोना विषाणूने कहरच केला असून, अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. मृत झाल्यानंतर मृतदेहाचे थेट आरोग्य ...

अमरावती : गत वर्षापासून कोरोना विषाणूने कहरच केला असून, अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. मृत झाल्यानंतर मृतदेहाचे थेट आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून दहन केले जात आहे. त्यामुळे खांदेकरी नाही अन्य विधीही नाही..! फोटो पूजन, १२ दिवस आधीच धार्मिक विधी उरकण्याचा प्रसंग नातेवाईकांवर ओढावला जात आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १,१९५ जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटरची कमतरता, रेमोसिविर इंजेक्शनची वानवा आदी कारणांनी रुग्ण मृत पावत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे चालते - बोलते रुग्णही तडफडून मृत पावत आहेत. कोरोना विषाणूचा आजारच भयंकर आहे. या आराजाने मृत झालेल्यांचा मृतदेह १ ते २ नातेवाईकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळत प्रशासनातर्फे दहन केले जात आहे. त्यामुळे खांदेकरी, तिसरा दिवस, बारावा दिवस असे कोणतेही धार्मिक विधीविना सोपस्कार पार पाडले जात आहेत. कावळ्याने नैवेद्य शिवण्याचा विषय तर लांबच राहिला आहे. जन्मदात्या आई-वडिलांचे दर्शनही कोरोनामुळे दुर्लभ झाले आहे. नातीगोतीही दुरावत आहेत. अनेक नवे संसार उभे राहण्याआधीच कोलमडले आहे. सुखाने नांदणारे संसार कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. कित्येक कुटुंबांचे आधारच कोरोनाने हिरावले आहेत. नात्यातील गोतावळा भीतीमुळे घुटमळला गेला आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी तर दूरच मृतदेहांवर अंतिम संस्काराला जाता येत नाही, हे दुर्दैव आहे. दु:खद समयी आधार देणारी नाती, मित्रमंडळी मात्र नाइलाजाने दूरच राहत आहेत. त्यामुळे आता कोरोना पासून बचाव करणे इतकेच आपल्या हाती राहिले आहे. कोरोनाने बरेच काही शिकवले त्यामुळे हाकेला ओ देणारी नातीगोती मात्र दुरावल्याचे कौटुंबिक दुर्दैव आहे.