शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

ना खांदेकरी, ना विधीचे सोपस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST

अमरावती : गत वर्षापासून कोरोना विषाणूने कहरच केला असून, अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. मृत झाल्यानंतर मृतदेहाचे थेट आरोग्य ...

अमरावती : गत वर्षापासून कोरोना विषाणूने कहरच केला असून, अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. मृत झाल्यानंतर मृतदेहाचे थेट आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून दहन केले जात आहे. त्यामुळे खांदेकरी नाही अन्य विधीही नाही..! फोटो पूजन, १२ दिवस आधीच धार्मिक विधी उरकण्याचा प्रसंग नातेवाईकांवर ओढावला जात आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १,१९५ जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटरची कमतरता, रेमोसिविर इंजेक्शनची वानवा आदी कारणांनी रुग्ण मृत पावत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे चालते - बोलते रुग्णही तडफडून मृत पावत आहेत. कोरोना विषाणूचा आजारच भयंकर आहे. या आराजाने मृत झालेल्यांचा मृतदेह १ ते २ नातेवाईकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळत प्रशासनातर्फे दहन केले जात आहे. त्यामुळे खांदेकरी, तिसरा दिवस, बारावा दिवस असे कोणतेही धार्मिक विधीविना सोपस्कार पार पाडले जात आहेत. कावळ्याने नैवेद्य शिवण्याचा विषय तर लांबच राहिला आहे. जन्मदात्या आई-वडिलांचे दर्शनही कोरोनामुळे दुर्लभ झाले आहे. नातीगोतीही दुरावत आहेत. अनेक नवे संसार उभे राहण्याआधीच कोलमडले आहे. सुखाने नांदणारे संसार कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. कित्येक कुटुंबांचे आधारच कोरोनाने हिरावले आहेत. नात्यातील गोतावळा भीतीमुळे घुटमळला गेला आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी तर दूरच मृतदेहांवर अंतिम संस्काराला जाता येत नाही, हे दुर्दैव आहे. दु:खद समयी आधार देणारी नाती, मित्रमंडळी मात्र नाइलाजाने दूरच राहत आहेत. त्यामुळे आता कोरोना पासून बचाव करणे इतकेच आपल्या हाती राहिले आहे. कोरोनाने बरेच काही शिकवले त्यामुळे हाकेला ओ देणारी नातीगोती मात्र दुरावल्याचे कौटुंबिक दुर्दैव आहे.