शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

ना ड्युटीचा वेळ, ना पगाराचा मेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST

सुमीत हरकूट चांदूर बाजार : ऊन, वारा, पाऊस असो वा सण उत्सव, नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलिसांची तैनाती असतेच. आंदोलन, मोर्चे, ...

सुमीत हरकूट

चांदूर बाजार : ऊन, वारा, पाऊस असो वा सण उत्सव, नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलिसांची तैनाती असतेच. आंदोलन, मोर्चे, नेत्यांचा सुरक्षेकरिता कडेकोट बंदोबस्ताला पोलीसच हवे असतात. कर्तव्यावर असताना वेळेचे भान नाही. कुटुंबाकरिता वेळ नाही. २४ तास तैनातीची टांगती तलवार, सतत काम असतानासुद्धा एखादी क्षुल्लक चूक जरी घडली तरी खापर मात्र पोलिसांचा माथी मारले जाते. एवढी सेवा देऊनही पोलिसांचे जीवन म्हणजे ना ड्युटीचा वेळ, ना पगाराचा मेळ असे झाले आहे.

कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा सण असो, नागरिक तो आनंदाने साजरे करीत असतात. पोलीस या आनंदात विरजण पडू नये म्हणून रस्त्यावर तैनात असतात. बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात असतो. तणावाखाली असलेल्या पोलिसांना विविध आजार जडतात. आपले आजार अंगावर घेऊन २४ तास नोकरी करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हक्काचीही सुट्टी उपभोगता येत नाही. आपल्या हक्काच्या सुटीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची अनेकदा हुजूरी करावी लागते. त्याशिवाय त्यांना सुटी दिली जात नाही.

नक्षलग्रस्त भागात तर पाहिजे त्या प्रमाणात पोलिस यंत्रणासुद्धा नाही. त्यामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण असतो. एखाद्या कुजलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे कामही या पोलिसांना करावे लागते. परंतु, शिस्त पाळावी लागत असल्याने मुकाट्याने अन्याय सहन करूनही आंदोलन वा धरणे देण्याचा अधिकार पोलिसांना नाही. चूक असो किंवा नसो, "बॉस इज ऑलवेज राईट" अशाच भूमिकेत पोलिसांना राहावे लागते. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांना वेतन कमी असते, तेही अनेकदा वेळेवर मिळत नाही.

बॉक्स

कामाला महत्व

पोलिसांना आपल्या कुटुंबाला देण्यासाठी वेळच उरत नाही. नोकरीवरून परत आल्यानंतर पत्नी किंवा मुलाबाळांना दुकानात खरेदीसाठी किंवा इतर ठिकाणी जाण्याची तयारी केली आणि त्याच वेळी पोलीस ठाण्यातून कॉल आला, तर त्यांना सर्व कामे बाजूला सारून आधी कर्तव्यावर जावे लागते. सतत कामात जुंपले असतानाही पोलिसांना पाहिजे तसा आदर मिळत नाही. वाट्याला येते ते फक्त निर्भत्सना.

आदर राखणे गरजेचे

सातत्याने नागरिकांचा सेवेत असलेल्या पोलिसांचा चुका काढण्यापेक्षा त्यांचा कामाचा आवाका पाहता, शासन व नागरिकांनी पोलिसांविषयी सन्मान व आदर व्यक्त करणे गरजेचे आहे. असे घडून आल्यास पोलिसांचा कामात प्रामाणिकता येऊन त्यांचा कामाचा, ताणाचा श्रमपरिहार झाल्याचा आनंद पोलिसांना होईल, हे मात्र निश्चित.