शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

वन्यजीव, वनसंरक्षणार्थ गोळीबारात मृत्यू झाल्यास थेट फौजदारी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST

(कॉमन) गणेश वासनिक अमरावती : वन्यजीव अथवा वनसंरक्षणार्थ गोळीबारात घटनास्थळी कोणी व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाल्यास अशावेळी पोलीस विभागाने ...

(कॉमन)

गणेश वासनिक

अमरावती : वन्यजीव अथवा वनसंरक्षणार्थ गोळीबारात घटनास्थळी कोणी व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाल्यास अशावेळी पोलीस विभागाने अगोदर चौकशी करावी. घटनेचे गांभीर्य जाणून घ्यावे. त्यानंतर फौजदारी कारवाई करावी, असे पत्र वनविभागाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठविले आहे.

वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) संजीव गौड यांनी २३ डिसेंबर २०२० रोजी पोलीस महासंचालक (डीजी) यांना पाठविलेल्या पत्रानुसार, वनविभागाला फाैजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १९७ (३) अंतर्गत वनाधिकाऱ्यांना वनांचे संरक्षण करीत असताना वैधानिक संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या माजी प्रधान सचिव नीला सत्यनारायण यांनी ९ सप्टेंबर २००६ च्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र, संरक्षित क्षेत्र आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. सागवान, चंदन तस्कर यांच्याशी दोन हात करताना बरेचदा वनाधिकारी, वनकर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन वनांचे संरक्षण करावे लागते. वाघ, बिबट यांच्यासह अन्य वन्यजिवांचे शिकारी यांच्याशीदेखील मुकाबला करावा लागतो. वन्यजीव तस्कर, शिकाऱ्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे असतात. अशावेळी वनाधिकाऱ्यांना संरक्षणार्थासाठी प्रतिउत्तर द्यावे लागते. अशावेळी गोळीबारात कोणी जखमी किंवा मृत्यू झाल्यास पोलिसांकडून चौकशी न करता संबंधितांवर थेट फौजदारी दाखल केली जाते. ही बाब फौजदारी प्रक्रिया संहितेविरुद्ध ठरणारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. पोलिसांनी फौजदारी दाखल करावी, यात दुमत नाही. मात्र, गोळीबार प्रकरणाचे गांभीर्य जाणून घ्यावे. कोणत्या परिस्थतीत वनकर्मचारी अथवा वनाधिकाऱ्यांनी गोळीबार केला, याची सत्यता तपासून घ्यावी. त्यानंतर वनाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, असे पत्र एपीसीसीएफ गौड यांनी पोलीस महासंचालकांना पाठविले आहे. यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर व पेंच येथे गोळीबारप्रकरणी वनाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल झाले आहे,

----------------------

वन विभागात यांच्याकडे आहेत शस्त्रे

- वनसंरक्षक, वनपाल : एसएलआर

- वनपरिक्षेत्राधिकारी, सहायक वनसंरक्षक, उपवनसंरक्षक : नाईन एमएम पिस्टल

-------------------

पोलीस ठाण्याला निर्देश द्यावे

वन्यजीव, वनांचे संरक्षण करताना अनुचित घटना घडल्यास वनाधिकारी, वनकर्मचारी यांच्यावर थेट फौजदारी कारवाई होऊ नये. पोलिसांत तक्रार आल्यास हमखास चौकशी करावी, त्यानंतरच संबंधितांवर घटनेचे गांभीर्य ओळखून फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला द्यावे, असे पत्र एपीसीसीएफ गौड यांनी पत्रात म्हटले आहे..