शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

अंतर प्रमाणपत्र देण्यास बांधकाम विभागाची ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सध्या शिक्षक बदल्यांचे वारे वाहत आहेत. शिक्षक बदली प्रक्रियेतील संवर्ग-२ मध्ये येणाऱ्या ...

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सध्या शिक्षक बदल्यांचे वारे वाहत आहेत. शिक्षक बदली प्रक्रियेतील संवर्ग-२ मध्ये येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना अंतराचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षरीने विहित मुदतीत सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, शिक्षण विभागाकडून यासंदर्भात नसलेल्या कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना व कोरोना संसर्गाचा हवाला देत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता शिक्षक बदली प्रक्रियेत नवा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

प्राथमिक शिक्षक सर्वसाधारण बदली प्रक्रियेतील संवर्ग-२ च्या शिक्षकांना बदलीकरिता अंतर प्रमाणपत्र २६ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करून २८ एप्रिलपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. परंतु, अंतर प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे सदरचे प्रमाणपत्र देण्यास अडचणी येत आहे. विशेष म्हणजे, वरील विषयाच्या अनुषंगाने बांधकाम विभागाशी पूर्व चर्चा होणे अपेक्षित होते, असेही या पत्रात बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

अंतर प्रमाणपत्रासाठी विभागीय कार्यालयात शिक्षक, कर्मचारी येत असल्याने कोविड-१९ चा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. अंतर प्रमाणपत्राचे ५०० ते १००० अर्ज या कार्यालयास प्राप्त झाल्याचा अंदाज आहे. अशातच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या २२ एप्रिलच्या आदेशानुसार कार्यालयातील उपस्थितीही १५ टक्के करण्यात आली आहे. वरील कामास कालमर्यादा दिली असल्याने बांधकाम विभागाला एवढ्या मोठ्या प्रमाणात या विभागाला प्रमाणपत्रे देणे शक्य होणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता शिक्षक बदलीतील संवर्ग-२ च्या शिक्षकांना अंतराचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी काय तोडगा काढतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

कोट

शिक्षक बदल्यासंदर्भातील अंतराचे प्रमाणपत्र देण्याबाबत बांधकाम विभाग व शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेतली. यामध्ये अंतराचे प्रमाणपत्र सहज देणे जेथे शक्य आहे, असे अर्ज निकाली काढले जातील व जेथे अडचण आहे, असे अर्ज शहानिशा करून निकाली काढण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी