शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अंतर प्रमाणपत्र देण्यास बांधकाम विभागाची ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सध्या शिक्षक बदल्यांचे वारे वाहत आहेत. शिक्षक बदली प्रक्रियेतील संवर्ग-२ मध्ये येणाऱ्या ...

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सध्या शिक्षक बदल्यांचे वारे वाहत आहेत. शिक्षक बदली प्रक्रियेतील संवर्ग-२ मध्ये येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना अंतराचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षरीने विहित मुदतीत सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, शिक्षण विभागाकडून यासंदर्भात नसलेल्या कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना व कोरोना संसर्गाचा हवाला देत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता शिक्षक बदली प्रक्रियेत नवा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

प्राथमिक शिक्षक सर्वसाधारण बदली प्रक्रियेतील संवर्ग-२ च्या शिक्षकांना बदलीकरिता अंतर प्रमाणपत्र २६ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करून २८ एप्रिलपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. परंतु, अंतर प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे सदरचे प्रमाणपत्र देण्यास अडचणी येत आहे. विशेष म्हणजे, वरील विषयाच्या अनुषंगाने बांधकाम विभागाशी पूर्व चर्चा होणे अपेक्षित होते, असेही या पत्रात बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

अंतर प्रमाणपत्रासाठी विभागीय कार्यालयात शिक्षक, कर्मचारी येत असल्याने कोविड-१९ चा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. अंतर प्रमाणपत्राचे ५०० ते १००० अर्ज या कार्यालयास प्राप्त झाल्याचा अंदाज आहे. अशातच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या २२ एप्रिलच्या आदेशानुसार कार्यालयातील उपस्थितीही १५ टक्के करण्यात आली आहे. वरील कामास कालमर्यादा दिली असल्याने बांधकाम विभागाला एवढ्या मोठ्या प्रमाणात या विभागाला प्रमाणपत्रे देणे शक्य होणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता शिक्षक बदलीतील संवर्ग-२ च्या शिक्षकांना अंतराचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी काय तोडगा काढतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

कोट

शिक्षक बदल्यासंदर्भातील अंतराचे प्रमाणपत्र देण्याबाबत बांधकाम विभाग व शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेतली. यामध्ये अंतराचे प्रमाणपत्र सहज देणे जेथे शक्य आहे, असे अर्ज निकाली काढले जातील व जेथे अडचण आहे, असे अर्ज शहानिशा करून निकाली काढण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी