शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

एकही बालक योग्य संगोपनापासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

यशोमती ठाकूर यांचे निर्देश, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण व संगोपन अमरावती : कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या ...

यशोमती ठाकूर यांचे निर्देश, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण व संगोपन

अमरावती : कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या संरक्षण व संगोपन योग्यरीत्या व्हावे, यासाठी अशा बालकांपर्यंत पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. असे एकही मूल संगोपन योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.

अनाथ बालक संगोपन टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी आ. सुलभा खोडके, आ. बळवंत वानखडे, आ. प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर यांनी कोविड साथीच्या काळात बालकाला संरक्षण, संगोपनाबाबत कुठलीही समस्या येत असेल, तर त्याचे तात्काळ निराकरण होणे व त्यांना योग्य निवारा मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न व्हावेत. लोकप्रतिनिधी, विविध संस्था यांचे सहकार्य मिळवून बाल संरक्षण कक्षाद्वारे अनाथ बालकांना संगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. कोरोनाकाळात इतरही आजारांनी पालक दगावले असतील, तर तशा अनाथ बालकांचीही माहिती गोळा करून त्यांच्याही योग्य संगोपनाच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी. दोन्ही पालक नसलेली अनाथ बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने अशा बालकांचा सर्वदूर शोध घ्यावा. एकही अनाथ मूल संगोपन योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यात कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेली १६६ बालके आहेत. त्यात दोन्ही पालक मृत्यू पावलेली आठ बालके आहेत. त्यांना संगोपन योजनेचा लाभ किंवा आवश्यकतेनुसार संस्थेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया होत आहे. नागरिकांनीही अशा बालकांबाबतची माहिती चाईल्ड लाईन १०९८ वर कळवावी, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले. यानिमित्त जनजागृती पत्रकाचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

०००