शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

निजामपूरला वादळाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:11 IST

फोटो पी २९ निजामपूर परतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात बुधवारी रात्रीला ११ वाजता दरम्यान वादळाने चांगलेच थैमान घातले. ...

फोटो पी २९ निजामपूर

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात बुधवारी रात्रीला ११ वाजता दरम्यान वादळाने चांगलेच थैमान घातले. यात गावातील नऊ ते दहा घरांवरील टिन उडालेत. घरावरील छप्पर कोसळले. गावातील कडूनिंबाची मोठी झाडे उन्मळून पडलीत.

निजामपूर गाव झोपायच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या या वादळामुळे गावकरी चांगलेच भयभीत झाले. यात शेतीतील पिकाचेही नुकसान झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

या वादळाची माहिती रात्रीलाच गावकऱ्यांनी तालुका प्रशासनास दिली. गुरुवारी अचलपूर तालुक्यात दुपारी ३.३० ते चार वाजेच्या दरम्यान वादळ झाले. थोडेबहुत पावसाचे थेंबही पडलेत. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा झाकण्याकरिता शेताकडे धाव घेतली. लगतच्या ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी परतवाडा शहर गाठून शेतातील पीक झाकण्याकरिता वेळेवर जाड प्लास्टिक व ताडपत्रीची खरेदी केली. याकरिता ओळखीच्या दुकानदारांना फोन लावून ती दुकाने वेळेवर त्यांनी उघडायला लावली. यात त्या दुकानदारांनीही गरजू शेतकऱ्यांना तेवढ्याच तातडीने मदतही केली. दरम्यान या वादळामुळे व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अचलपूर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात विजेचे येणे जाणे सुरू होते. वीज पुरवठा अधून-मधून खंडित होत होता.