शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

निपाह व्हायरस : आरोग्य यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:12 IST

केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नागरिकांनी केरळ व बांग्लादेशचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेरळ, बांग्लादेश प्रवास टाळा : जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नागरिकांनी केरळ व बांग्लादेशचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.केरळमध्ये निपाहमुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला. या आजाराचा उद्रेक झाला असून, तो अन्य राज्यात पसरू नये, याची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे. या आजाराचा महाराष्ट्र राज्याला फारसा धोका नसला तरी राज्यभरात खबरदारी घेतल्या जात आहे. निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण सुरू झाले असून, प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपापयोजना आखल्या जात आहेत. निपाह विषाणू सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशियामध्ये आढळून आला होता. भारतात सिलिगुडी (२००१) आणि नाडिया (२००७) या पश्चिम बंगालच्या भागात या विषाणूचा उद्रेक यापूर्वीच झाला होता. बांग्लादेशात या आजाराचा उद्रेक दरवर्षीच दिसून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी जिल्ह्यात घेतली जात आहे.मागील तीन आठवड्यात केरळमधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात किंवा बांग्लादेश सीमेलगतच्या भागात प्रवास करणाºयांना जर निपाहची लक्षणे आढळून आली असले, त्यांनी त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क करणे आवश्यक आहे.विषाणूचा प्रसार होतो कसा?निपाह विषाणूचा प्रसार हा फळांवर जगणाºया वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील निपाहची बाधा होऊ शकते. निपाह विषाणूची लागण संसर्गातून दुसºया माणसाला होऊ शकते. रुग्णावर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो.शेतात, जंगलात पडलेली फळे खाणे टाळानिपाह विषाणुमुळे होणारा आजार हे वटवाघळाच्या स्रावातून पसरतो. वटवाघूळ हे शेतात किंवा जंगलात झाडावरील फळे खातात. त्यामुळे तेथील फळामध्ये वटवाघळांचा स्राव असू शकतो. त्यामुळे शेतात व जंगलात पडलेली फळे खाऊ नका, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.लक्षणेनिपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.उपचारनिपाह विषाणू आजारावर कोणतेही औषध नाही. रॅबाविरिन हे विषाणुरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रुषा यावर भर दिला जातो.निपाह विषाणूच्या निदानासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा, नाक, स्राव, मूत्र व रक्त नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे करण्यात येते.निपाह विषाणूमुळे होणाºया आजाराची खबरदारी आरोग्य यंत्रणेमार्फत घेतल्या जात आहे. नागरिकांनी केरळ व बांग्लादेशातील प्रवास टाळावा. ज्यांनी आठ दिवसांपूर्वी केरळ व बांग्लादेशात प्रवास केला असेल आणि निपाहची लक्षणे आढळून आली असतील, त्यांनी त्वरित जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सकअमरावती.