शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वाहनांचे आतापर्यंत नऊ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST

फोटो - रस्त्याचा पाहतो. महामार्ग धोकादायक, जरुडात गतिरोधक बसविण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा जरूड : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत ...

फोटो - रस्त्याचा पाहतो.

महामार्ग धोकादायक, जरुडात गतिरोधक बसविण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा जरूड : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या लौकीकप्राप्त जरूड येथे सुसाट वाहनांचे नऊ बळी झाले आहेत. डाॅ. हेमा पाटील, जयवंत यावले, विठ्ठलराव धस, जयवांताबई खत्री, उत्क्रांती शाळेच्या बेनोडा येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचाही यात समावेश आहे. महामार्गावर हे अपघात झाले आहेत.

जरूड येथील बस स्थानकापुढून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. वरूड-अमरावती महामार्गावरील हे गाव २२ हजार लोकवस्तीचे आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बाळासाहेब देशमुख कन्या शाळा, जरूड हायस्कूल जरुड, विवेकानंद इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, शशिकलाबाई बोरकर प्राथमिक शाळा, कला वाणिज्य महाविद्यालय, उत्क्रांती शिक्षण संस्थेच्या विविध शाळा आहेत. यात एकूण ३५०० विद्यार्थी दररोज शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना ८० फूट रुंदीचा महामार्ग आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. महामार्गाच्या नव्याने झालेल्या रुंदीकरणात लावलेल्या दुभाजकामुळे येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. येथे जर गतिरोधक बसविण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोशन दारोकर यांनी दिला आहे.

यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे गतिरोधक बसविण्यासाठी मोठे जनआंदोलन झाले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन गावात तीन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. परंतु एचजी इन्फ्रा या कंपनीने केलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे पूर्वी असलेले गतिरोधक नाहीसे झाले. नवीन रस्त्यावरून अवैध वाहतूकदार वाहने सुसाट पळवितात, अशी विद्यार्थी, ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण प्रशासनाला मिळविता आलेले नाही. वाहतूक नियमन करण्यासाठी येथे उभे केलेले अधिकारी, कर्मचारी फक्त शोभेची वस्तू ठरले आहेत. गतिरोधक बसवण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार पत्रव्यवहार, विनंती करूनसुद्धा फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने जरूडकरांचे प्राण धोक्यात आले आहे.

-----------

जरूड हे तालुक्यातील मोठे गाव आहे. वरूड-अमरावती महामार्गावरच सर्व शाळा आहेत. या मार्गावर वाहतूक सुसाट असल्याने त्यांच्यावर नियंत्रणासाठी गतिरोधक आवश्यकच आहे. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

- किशोर गावंडे, तहसीलदार, वरूड

---------------

माझी पत्नी डॉ. हेमा पाटील यांना रस्ता अपघातात गमावले. त्यानंतर महत्प्रयासाने येथे गतिरोधक लागले. परंतु, महामार्ग निर्मितीत हे गतिरोधक नष्ट झाले. आता किती जणांचे प्राण गेल्यानंतर पुन्हा गतिरोधक बसविले जाणार आहे?

- डॉ. सुशील पाटील, जरूड