शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ग्रामीण भागातील साडेनऊ हजार घरे नियमानुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

अमरावती : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांची सुमारे साडेनऊ हजार प्रकरणे ...

अमरावती : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांची सुमारे साडेनऊ हजार प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारा आता तीन दिवसांची विशेष मोहीम राबवून अनेक दस्त नोंदणी प्रकरणांचाही निपटारा केला. अतिक्रमणधारकांचे घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

आवास योजनांच्या उद्दिष्टानुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून गरजूंना घर मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सुस्पष्ट सूचना दिल्या होत्या. तीन दिवसांत मोहिमेद्वारे अनेक प्रकरणांचा निपटारा झाला. त्यामुळे ९,४९३ लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

अमरावती उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून ३७ गावांतील एकूण ९६९ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. तिवसा-भातकुली उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून १८ गावांतील एकूण २९९ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. चांदूर रेल्वे उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून ३५ गावांतील एकूण ३,३९८ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. अचलपूर उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून १०१ गावांतील एकूण २ हजार ७०९ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. दर्यापूर उपविभागात ५२ गावांतील ७०९, मोर्शी उपविभागातील १०२ गावांतील १,३१५ व धारणी उपविभागातील ११ गावांतील ९४ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली व दस्तनोंदणीच्या ९४२ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आल्याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांनी सांगितले.

बॉक्स

सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवून राबविली मोहीम

जिल्ह्यात २६ ते २८ मार्च दरम्यान मोहिमेमध्ये ज्या लाभार्थींकडे जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतीने राबवली गेली. एकूण ४९२ लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे जमिनीचा लाभ मिळून त्यांचा जागेचा प्रश्न निकाली निघाला. त्यासाठी २७ व २८ मार्चला सार्वजनिक सुटीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये, तालुका मुख्यालयाच्या राष्ट्रीयीकृत बँका सुरू ठेवण्यात आल्या.

कोट

प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहता कामा नये. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

- यशोमती ठाकूर, पालकमंत्री

कोट

आवास योजनेतील प्रत्येक बाब जलद पूर्ण करण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे होत आहेत. त्यामुळे हजारो घरकुलांच्या कामांना गती मिळेल व नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी