शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

ग्रामीण भागातील साडेनऊ हजार घरे नियमानुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

अमरावती : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांची सुमारे साडेनऊ हजार प्रकरणे ...

अमरावती : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांची सुमारे साडेनऊ हजार प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारा आता तीन दिवसांची विशेष मोहीम राबवून अनेक दस्त नोंदणी प्रकरणांचाही निपटारा केला. अतिक्रमणधारकांचे घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

आवास योजनांच्या उद्दिष्टानुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून गरजूंना घर मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सुस्पष्ट सूचना दिल्या होत्या. तीन दिवसांत मोहिमेद्वारे अनेक प्रकरणांचा निपटारा झाला. त्यामुळे ९,४९३ लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

अमरावती उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून ३७ गावांतील एकूण ९६९ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. तिवसा-भातकुली उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून १८ गावांतील एकूण २९९ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. चांदूर रेल्वे उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून ३५ गावांतील एकूण ३,३९८ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. अचलपूर उपविभागात गावठाण, ई-क्लास, एफ-क्लास व इतर शासकीय मिळून १०१ गावांतील एकूण २ हजार ७०९ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. दर्यापूर उपविभागात ५२ गावांतील ७०९, मोर्शी उपविभागातील १०२ गावांतील १,३१५ व धारणी उपविभागातील ११ गावांतील ९४ प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली व दस्तनोंदणीच्या ९४२ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आल्याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांनी सांगितले.

बॉक्स

सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवून राबविली मोहीम

जिल्ह्यात २६ ते २८ मार्च दरम्यान मोहिमेमध्ये ज्या लाभार्थींकडे जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतीने राबवली गेली. एकूण ४९२ लाभार्थींना बक्षीसपत्राद्वारे जमिनीचा लाभ मिळून त्यांचा जागेचा प्रश्न निकाली निघाला. त्यासाठी २७ व २८ मार्चला सार्वजनिक सुटीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये, तालुका मुख्यालयाच्या राष्ट्रीयीकृत बँका सुरू ठेवण्यात आल्या.

कोट

प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहता कामा नये. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

- यशोमती ठाकूर, पालकमंत्री

कोट

आवास योजनेतील प्रत्येक बाब जलद पूर्ण करण्यासाठी ‘मिशन मोड’वर कामे होत आहेत. त्यामुळे हजारो घरकुलांच्या कामांना गती मिळेल व नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी