शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या कल्याणासाठी ‘एनजीओं’चा पुढाकार आवश्यक

By admin | Updated: October 10, 2016 00:12 IST

जिल्ह्यात अपंगांची संख्या ७७ हजार आहे. त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्याच्या दृष्टीने अपंगांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा,...

रामदास आठवले : सामाजिक न्याय विभागाची बैठक अमरावती : जिल्ह्यात अपंगांची संख्या ७७ हजार आहे. त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्याच्या दृष्टीने अपंगांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.शासकीय विश्रामगृहात रविवारी ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध विभागांतील कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, महापालिका आयुक्त हेमंत पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम, विभागीय समाजकल्याण अधिकारी दीपक वडकुते, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी भीमराव खंडाते, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी ना. आठवले यांनी विभागात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत ग्रामीण व शहरात दाखल गुन्ह्यांसंदर्भात तसेच झालेल्या प्रगतीबाबत आढावा घेतला. पोलीस आयुक्त मंडलिक म्हणाले, शहरात चालू वर्षात या कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्काराचे ६ विनयभंगाचे ७, शिवीगाळ व अन्य शिविगाळीच्या संदर्भात १४ प्रकरणे आहेत. मागील वर्षी ३३ प्रकरणे व सन २०१४ मध्ये २० प्रकरणे दाखल होती. पोलीस अधीक्षक लखमी गौतम म्हणाले, चालू वर्षी एकूण ८३ गुन्हे दाखल आहेत. सन २०१४ मध्ये ७३ आणि सन २०१५ मध्ये ८३ गुन्हे दाखल होते. त्याची यावेळी तपशिलवार माहिती मंत्र्यांना देण्यात आली. मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी रमाई आवास योजनेंतर्गत झालेल्या कामकाजाची माहिती दिली. मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी दिली. जात प्रमाणपत्र पडताळणीचे दरमहा १५०० ते २५०० प्रकरणे दाखल होतात. यात प्रलंबित प्रकरणे फारशी नसल्याचे रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्यात २४८८८ विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिष्यवृत्ती देण्यासाठी नोंदणी झाली आहे. ‘फ्रीशिप’ शिष्यवृत्तीची १,६६१ प्रकरणे असल्याची माहिती सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी दिली. ना. आठवले यांनी याबाबत काही महत्त्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. (प्रतिनिधी)