शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढण्याच्या कामाला कंत्राटदाराकडून बगल

By admin | Updated: May 25, 2016 00:44 IST

टंचाईग्रसत तारुबांदा या गावातील एकमेव तलावाचे गाळ काढून खोलीकरणाचे काम प्रस्तावित असताना कंत्राटदाराने

टंचाईग्रस्त तारुबांदा : व्याघ्र जंगलात खोदकामधारणी : टंचाईग्रसत तारुबांदा या गावातील एकमेव तलावाचे गाळ काढून खोलीकरणाचे काम प्रस्तावित असताना कंत्राटदाराने लगतच्या व्याघ्र प्रकल्पातील जंगालतून मुरूम खोदण्याचे अफालतून प्रकार सुरू केल्याने मूळ उद्देशाला बगल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामावर होणारे २५ कोटी रुपयांचे खर्च पाण्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धारणीपासून ४० किमी अंतरावरील चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा हे गाव आहे. या गावात उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ४ महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीसुद्धा टँकरद्वारे एकमात्र विहिरीत पाणी सोडण्यात येत असून नंतर दोरीने पाणी काढण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे एकाच विहिरीवर संपूर्ण गावाची तहान भागविली जात आहे. या नेहमीच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून विहिरीच्या दक्षिणेला असलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय जि.प.सदस्य महेंद्र सिंह गैलवार यांनी घेतला. त्यांनी महात्मा फुले योजनेत या तलावाचे खोलीकरण व गाळ उपसण्याचे कामाला मंजुरी मिळवून दिली. त्यानुसार कामाची निविदाही काढण्यात आली. कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. मात्र गाळ उपसण्याचे सोडून लगतच्या भूभागातून मुरूम खोदण्याचे काम सुरू केले. या प्रकाराला तारुबांदा व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौदागर यांनी त्वरित बंदी आणली व कामात होत असलेला गैरप्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही न जुमानता जेसीबीच्या सहाय्याने मुरूम खोदण्याचे काम सुरूच होते. याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. गावकऱ्यांनीसुद्धा गाळ काढण्याचा आग्रह धरला. गाळ काढण्यात जास्त परिश्रम लागत असल्याने कंत्राटदाराने कामच बंद केल्याचे आज प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता निदर्शनास आले आहे. गाव तलावातील प्राणी उपासण्याचे काम गावकऱ्यांनी स्वत:कडील ५-६ आॅईल इंजीन लावून केले. मात्र गाळ काढण्याचे वेळी कंत्राटदाराने काम बंद करुन दिले. याबाबत गावकऱ्यांनी संवाद साधला असता कंत्राटदाराकडून डिझेल संपले, जेसीबी खराब झाले, असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे तारुबांदा गावकऱ्यांची पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा मावळली आहे. (तालुका प्रतिनिधी) गावतलाव हे तारुबांदाची तहान व इतर गरजा मागविण्याचे महत्त्वाचे स्त्रोत्र आहे. या तलावातील गाळ काढून खोलीकरण झाल्यास येथील पाणी समस्या नेहमीसाठी दूर होईल. यासाठी गावकऱ्यांना कामाचे नियोजन निविदेप्रमाणे व अंदापत्रकानुसार करण्याची सूचना दिली आहे.- सौदागर, वन परिक्षेत्र अधिकारी, तारुबांदातारुबांदा हे गाव माझे मतदारसंघ चिखलीत येते. या गावताील पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर व्हावी, या हेतुने तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाला मंजुरात आणून दिली. मात्र कंत्राटदाराच्या मनमानीमुळे गाळ उपसण्याचे काम बंद पडले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.- महेंद्रसिंह गैलवार, जि.प.सदस्य, चिखली सर्कल