शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

नवजाताचा गाडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर

By admin | Updated: November 1, 2016 00:10 IST

तीन दिवसांच्या नवजात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आला.

हळहळ : सुनेच्या सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोपदर्यापूर : तीन दिवसांच्या नवजात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यामुळे सुनेच्या सासरच्या मंडळींनी नवजात नातीची हत्या करून मृतदेह पुरल्याचा आरोप सासूने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. ही घटना रविवारी म्हणजे दिवाळीच्या मध्यरात्री घडली. बाभळी येथील चंद्रभागेच्या पात्रातून नवजात अर्भकाचे पार्थिव सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रानुसार, ऋषता हर्षल खंडारे (२३, रा. अमरावती) नामक महिलेला तिच्या माहेरी धामोडी येथे प्रसूतीकरीता आणण्यात आले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी तिला दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला डफरीनला रेफर केले. रविवारी सकाळी ७ वाजता तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्र्रकृती चांगली असल्यामुळे तिला सुटी सुद्धा देण्यात आली. बाळाला दाखल केले होते खासगी रुगणालयातदर्यापूर : त्यामुळे ती नवजात बाळासह दर्यापूरला आली. मात्र, पुन्हा बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचाराकरीता आणले. दुर्देवाने उपचारादरम्यान बाळ दगावल्याचे तिच्या माहेरच्या मंडळीची म्हणणे आहे. परंतु हर्षल खंडारेची आई चंद्रकला खंडारे यांनी मुलाच्या सासरच्या मंडळींनी संगनमत करुन बाळाची हत्या केल्याचा व प्रकरण दडपण्यासाठी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केल्याची तक्रार पोलिसांत दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिसांनी हे प्रकरण तपासात घेतले आहे. चंद्रभागेच्या पात्रात अर्भकाला गाढल्याची तक्रार अर्भकाच्या आजीनेच दिल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा या अर्भकाला बाहेर काढले. या घटनेचा पुढील तपास दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे करीत आहेत. (प्रतिनिधी)अर्भकाची प्रकृती नाजूक व वजन कमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे उपचारादरम्यान ते अर्भक दगावले. - डॉ. राजेंद्र भट्टड संचालक, गोदावरी हॉस्पिटल दर्यापूरअर्भकाच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमके मृत्युचे नेमके कारण समोर येईल. या अहवालानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल. तपास सुरु आहे. - नितीन गवारे, ठाणेदार, दर्यापूर