शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

वाघांच्या स्थलांतरणाची नवी समस्या

By admin | Updated: February 3, 2017 00:13 IST

व्याघ्र प्रकल्पांमध्येच वाघांचे अस्तित्व, अधिवास असल्याचा समज आता वाघांनी मोडून काढला आहे.

चालण्याचा वेग वाढला : वाघाने कापले २०० किलोमीटरचे अंतर गणेश वासनिक  अमरावतीव्याघ्र प्रकल्पांमध्येच वाघांचे अस्तित्व, अधिवास असल्याचा समज आता वाघांनी मोडून काढला आहे. अनेक व्याघ्र प्रकल्पांमधून शेकडो किलोमीटरचा पल्ला गाठून ते नवा घरोबा शोधत असल्याने ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. तसेच वाघांच्या चालण्याचा वेग वाढल्याने हा संशोधनाचा विषय ठरला आहे.देशात ४९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २० टक्के व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ८० टक्क्यांच्या घरात आहे. यात राज्यातील पेंच, ताडोबा, नवेगाब बांध, नागझिरा, मेळघाट तर मध्यप्रदेशातील कान्हा, पन्ना, पेंच आसामातील मानस, वाल्मिकी, राजस्थानच्या रणथंबोर या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी जागा अपुरी पडत असल्याने स्थलांतरणाच्या घटना निदर्शनास येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने देशभरातील व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांना सूक्ष्म लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. राज्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ मेळघाटपेक्षाही कमी असले तरी ताडोबातून वाघांचे स्थलांतर अधिक प्रमाणात होते. ताडोब्यातून गडचिरोली, मध्यप्रदेश, तेलंगणाच्या सीमा ओलांडून वाघ स्थलांतर करीत आहेत.२०१० मध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्पातून एका वाघाने २०० कि.मी.चे अंतर ओलांडून मध्यप्रदेशातील पेंचमध्ये विसावा घेतला होता तर १५० किलोमीटर प्रवास करून कळमेश्वरचा वाघ पोहरा, चिरोडी जंगलात रमला आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघ अदिलाबाद, आंध्रप्रदेश, तेलंगणापर्यंत ये-जा करीत असल्याचा अहवाल वन्यजीव विभागाने राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाला दिला आहे. मध्यप्रदेशातील पेंच, कान्हा व पन्नामधील वाघ छिंदवाडा, शिवनी भागात रमले आहेत. परिणामी व्याघ्रांचे स्थलांतरण का वाढले, याचा शोध घेणे गरजेचे ठरणार आहे. स्थलांतरित वाघांना त्यांच्या घरी सोडणार कसे?स्थलांतरित वाघांना पुन्हा त्याच व्याघ्र प्रकल्पात सोडण्याबाबतचे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे आदेश आहेत. मात्र स्थलांतरित वाघ कसे, कोठे शोधावेत, हा प्रश्न व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांसमोर निर्माण झाला आहे. स्थलांतरित वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना पकडण्याची नवी समस्या निर्माण झाली आहे.