शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

मार्चपासून नवा कायदा लागू

By admin | Updated: January 18, 2017 00:14 IST

महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विधेयक - २०१६ हा विधानसभेत पारित झाल्यानंतर या मसुद्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची स्वाक्षरी झाली आहे.

अध्यादेशाची प्रतीक्षा : तंत्र, शिक्षण विभागात हालचालीअमरावती : महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विधेयक - २०१६ हा विधानसभेत पारित झाल्यानंतर या मसुद्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची स्वाक्षरी झाली आहे. आता या नव्या कायद्याचे अध्यादेश राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये येत्या मार्चपासून लागू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, गोंडवाणा, पुणे यासह ११ परंपरागत विद्यापीठात नवा कायदा लागू होणार आहे. विद्यापीठात शिक्षण प्रणालीत सुधारणा व्हावी, यासाठी विधानसभेत विधेयक पारित झाले आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी २१ सदस्यीय संयुक्त समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने सुचविलेल्या ५६ शिफारसी आणि दुरुस्त्यांचा अहवाल हिवाळी अधिवेशनात मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यासाठी जुन्या कायद्यांना फाटा मिळणार आहे. विद्यार्थी, रोजगार, पारदर्शक शिक्षण प्रणाली आदी बाबींना नव्या कायद्यात महत्व देण्यात आले आहे. नवा कायदा मार्चपासून विद्यापीठात लागू व्हावा, यासाठी राज्याचे तंत्र व शिक्षण विभागात हालचालींना वेग आला आहे. नवा कायदा लागू होणार असल्याने अधिसभेसह विविध प्राधिकरणांच्या नियुक्त्यांना लगाम लावण्यात आला आहे. कायद्याअभावी विद्वत परिषदेचा कारभारही मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरोवशावर सुरू आहे. नव्या कायद्यामुळे विद्वत्त परिषद, विद्यार्थी परिषद, कर्मचारी तक्रार निवारण केंद्र, विद्यार्थी निवडणुका आदींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याचे संकेत आहे. मार्चपासून विद्यापीठात नवा कायदा लागू होत असल्याने राज्याच्या तंत्र व शिक्षण विभागाने जोरदार हालीचाली सुरू केल्या आहेत. सर्व शासकीय सोपस्कार दोन महिन्यांत पूर्ण करून विद्यापीठात नवा कायदा लागू होईल. त्यानंतर विद्यापीेठांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागतील, असे बोलले जात आहे. नव्या कायद्यानंतर पदवीधर नोंदणी आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांनाही वेग येणार असल्याचे संकेत आहे. एकूणच विद्यापीठाच्या कारभारात आमूलाग्र बदल होईल, यात दुमत नाही. (प्रतिनिधी)नव्या कायद्याचा अध्यादेश यायचा आहे. मात्र १ सप्टेंबरपासून नव्या कायद्यानुसार सर्व प्राधिकरणांच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले आहे. या निवडणुकांसाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.- अजय देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ