शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मार्चपासून नवा कायदा लागू

By admin | Updated: January 18, 2017 00:14 IST

महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विधेयक - २०१६ हा विधानसभेत पारित झाल्यानंतर या मसुद्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची स्वाक्षरी झाली आहे.

अध्यादेशाची प्रतीक्षा : तंत्र, शिक्षण विभागात हालचालीअमरावती : महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक विधेयक - २०१६ हा विधानसभेत पारित झाल्यानंतर या मसुद्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची स्वाक्षरी झाली आहे. आता या नव्या कायद्याचे अध्यादेश राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये येत्या मार्चपासून लागू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, गोंडवाणा, पुणे यासह ११ परंपरागत विद्यापीठात नवा कायदा लागू होणार आहे. विद्यापीठात शिक्षण प्रणालीत सुधारणा व्हावी, यासाठी विधानसभेत विधेयक पारित झाले आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी २१ सदस्यीय संयुक्त समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने सुचविलेल्या ५६ शिफारसी आणि दुरुस्त्यांचा अहवाल हिवाळी अधिवेशनात मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यासाठी जुन्या कायद्यांना फाटा मिळणार आहे. विद्यार्थी, रोजगार, पारदर्शक शिक्षण प्रणाली आदी बाबींना नव्या कायद्यात महत्व देण्यात आले आहे. नवा कायदा मार्चपासून विद्यापीठात लागू व्हावा, यासाठी राज्याचे तंत्र व शिक्षण विभागात हालचालींना वेग आला आहे. नवा कायदा लागू होणार असल्याने अधिसभेसह विविध प्राधिकरणांच्या नियुक्त्यांना लगाम लावण्यात आला आहे. कायद्याअभावी विद्वत परिषदेचा कारभारही मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरोवशावर सुरू आहे. नव्या कायद्यामुळे विद्वत्त परिषद, विद्यार्थी परिषद, कर्मचारी तक्रार निवारण केंद्र, विद्यार्थी निवडणुका आदींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याचे संकेत आहे. मार्चपासून विद्यापीठात नवा कायदा लागू होत असल्याने राज्याच्या तंत्र व शिक्षण विभागाने जोरदार हालीचाली सुरू केल्या आहेत. सर्व शासकीय सोपस्कार दोन महिन्यांत पूर्ण करून विद्यापीठात नवा कायदा लागू होईल. त्यानंतर विद्यापीेठांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागतील, असे बोलले जात आहे. नव्या कायद्यानंतर पदवीधर नोंदणी आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांनाही वेग येणार असल्याचे संकेत आहे. एकूणच विद्यापीठाच्या कारभारात आमूलाग्र बदल होईल, यात दुमत नाही. (प्रतिनिधी)नव्या कायद्याचा अध्यादेश यायचा आहे. मात्र १ सप्टेंबरपासून नव्या कायद्यानुसार सर्व प्राधिकरणांच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले आहे. या निवडणुकांसाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.- अजय देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ