शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

नव्या निर्णयाला पक्षाचे बंधने नाहीत

By admin | Updated: August 23, 2014 02:22 IST

सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, असे नव्या नियमात नमूद आहे.

अमरावती : सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, असे नव्या नियमात नमूद आहे. त्यानुसार महापालिकेत २३ सदस्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट या नावाने आघाडी स्थापन केली. सर्व सदस्यांचे स्वतंत्र प्रतिज्ञापत्र घेऊन गट स्थापन करताना या गटाचे गटनेते म्हणून अविनाश मार्डीकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. हा फ्रंट निवडणुकीनंतर तयार करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी या नावाचा वापर होत असल्याचा नियम लागू होत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे गटनेता बदलविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. अविनाश मार्डीकर यांच्या जागी सुनील काळे यांची गटनेतेपदी वर्णी लावण्यात आली. गटातील कोणत्याही सदस्यांची मागणी नसताना मार्डीकर यांना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्यांनी गटनेते पदाचे अधिकार सुनील काळे यांना असल्याचे अधिकृत पत्र काढले. हेच पत्र विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले. आयुक्तांनी अविनाश मार्डीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था अपात्र नियमात बसत नसतानाही विभागीय आयुक्तांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला होता, असा आरोप खोडके यांनी केला. याबाबत मार्डीकर यांची उच्च न्यायालयात याचिका सादर करताना हे प्रकरण ‘केस लॉ’ प्रमाणे हाताळण्यासाठी प्रदीप महल्ले, अशोक जैन, जी.एम. भांगडे,किशोर शेळके यांनी सहकार्य केले. एकदा गट स्थापन झाल्यानंतर गटनेता बदलविण्याचे अधिकार पक्षाला नसून गटातील दोन तृतीयांश सदस्यांनी मागणी केली तरच गटनेता बदलण्याचे अधिकार आयुक्तांना नव्या कायद्यानुसार असल्याचे खोडके यांनी सांगितले. मार्डीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई सत्तेच्या दबावाखाली विभागीय आयुक्तांनी घेतली असली तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने निकाल आपल्याच बाजूने लागेल, अशी आशा होती. तो विश्वास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकाल्याने सार्थकी लागल्याचे मत खोडके यांनी व्यक्त केले. मात्र विभागीय आयुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या न्याय निर्वाळ्याचे बहाल करण्यात आलेले अधिकार राजकीय दबावाखाली दिली जात असेल तर ते अधिकार काढून टाकावे, अन्यथा सदस्य ज्या भावनेने निवडणुकीला सामोरे जातो, त्याचे जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी वऱ्हाड विकास मंचच्या संस्थापक सुलभा खोडके, प्रदीप महल्ले, अशोक जैन, अविनाश मार्डीकर, किशोर शेळके, सुनील बोळे, चेतन पवार, संजय आसोले, हमीद शद्दा, जावेद मेमन, रिना नंदा, ममता आवारे, वंदना हरणे, सारिका महल्ले आदी उपस्थित होते.