शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोरोना आटोक्यात आल्यानंतरच नव्या शैक्षणिक सत्राला होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याशिवाय ...

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याशिवाय नवीन शैक्षणिक वर्षात घाईघाईने शाळा सुरू करण्यात येणार नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

शिक्षण विभागाने गेल्यावर्षी १५ जूनला, तर विदर्भातील शाळा २६ जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू केले होते. शाळा बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली. आता शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी लागली आहे. १४ जून तर विदर्भातील शाळा २८ जूनपासून सन २०२१-२२ चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्ष जरी सुरू झाले तरी, लगेच शाळा सुरू करण्यात येणार नाहीत. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग झाल्याचे बऱ्याच ठिकाणी आढळून आले, तर तुलनेने पहिल्या लाटेत हे प्रमाण जवळपास नव्हतेच. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत शाळकरी बालकांना अधिक आहे. धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने पालकांची चिंता वाढू लागली आहे. तसेच कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर मुलांना शाळेत पाठविणार असल्याची भूमिका पालकांनी सतत स्पष्ट केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण समितीने शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

बॉक्स

आरोग्य सुविधेला महत्त्व

आरोग्य सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांना घरात राहूनच शिक्षण घेता यावे, यासाठीच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. बालभारतीची पुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. विद्या प्राधिकरणाकडूनही विविध माध्यमांतून ऑनलाईन शिक्षण देण्याच्यादृष्टीने विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोट

शाळा सुरू होण्याअगोदर २ ते १८ वर्षांच्या सर्व मुलांचे लसीकरण करण्यात यावे. ही मोहीम गावपातळीवर शासनाने राबवावी.

- राजेश सावरकर

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती