शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

जिल्ह्यात नवे १५ उद्योग

By admin | Updated: December 6, 2015 00:04 IST

पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत.

प्रवीण पोटे : सहा महिन्यांत बेलोऱ्यातून ‘टेक आॅफ’अमरावती : पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत. आणखी १५ उद्योग येणार आहेत. लवकर हे उद्योजक पाहणी करणार आहेत. यामध्ये यवतमाळच्या रेमंड उद्योगाही समावेश आहे. या उद्योगांना शासन सवलती देणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईला बैठक पार पडली असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.अमरावती व कोल्हापूर शहराचा विकास सारखाच झाला. परंतु कोल्हापूर विकासात खूप पुढे गेले, अमरावती मात्र माघारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात शहरात ६५० कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. विकास हा सार्वजनिक असावा यात कुठलेही राजकारण नसावे, असे पालकमंत्री म्हणाले. बेलोरा, अकोला व चंद्रपूर येथून एटीआर व अन्य विमानांचे ६ महिन्यांत ‘टेक आॅफ’ होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यासाठी १३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धावपट्टी बदलणे, टॉवर लाईन अन्यत्र हलविणे आदी कामे होणार आहेत. सिंचनाचे ४० प्रोजेक्ट मार्गी लागले आहेत. काही रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी विजेची समस्या होती ती मार्गी लागली आहे. आतापर्यंत १०० नवीन रोहीत्र बसविण्यात आलेले आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.‘पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान’ राज्यात पायलट प्रोजेक्ट ठरावा, ही संकल्पना‘पालकमंत्री पांदन रस्ते विकास अभियान’ याअंतर्गत जिल्ह्यातील अडीच हजार पांदन रस्ते निर्मितीचे ‘लक्ष्य’ आहे, जिल्ह्यात ४ हजार पांदण रस्ते आहेत. दोन आठवड्यांत २०० रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. जिल्ह्यात ५२५ तलाठी आहे. प्रत्येकांना ५ रस्त्याचे टार्गेट दिले आहे. यासाठी महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांची कार्यशाळा आपण घेतली. ग्रामीण भागात हे रस्ते ‘लाईफ लाईन’ आहे. हे सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून मातीकामच नव्हे तर खडीकरण करण्यात येणार आहे. हे अभियान राज्यासाठी पायलट प्रोजेक्ट ठरावा, अशी आपली संकल्पना असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. प्रत्येक नगरपंचायतींना देणार ६० लाख जिल्ह्यात नव्याने नगरपंचायती स्थापित झाल्यात. यांना शासनाचा निधी नसतो. यासाठी आपण वेगळी योजना आखली आहे. त्या अंतर्गत या नगरपंचायतींना विकासासाठी प्रत्येकी ६० लाख देणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखांचा विकास निधी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.आतापर्यंत ७८ हजार नागरिकांशी संपर्कपालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारी, रविवारी शासकीय विश्रामगृहात आपण नागरिकांना उपलब्ध असतो. आतापर्यंत ७८ हजार नागरिकांना भेटलो असून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे ना.पोटे यांनी सांगितले. ५० हजार युवकांना रोजगार निर्मितीजिल्ह्यात नव्याने उद्योग येत आहेत. यामध्ये किमान ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी कुशल व अकुशल कामगार तयार करणे, प्रशिक्षण देणे यासाठी ना. रणजित पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत, असे पोटे यांनी सांगितले.