शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जिल्ह्यात नवे १५ उद्योग

By admin | Updated: December 6, 2015 00:04 IST

पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत.

प्रवीण पोटे : सहा महिन्यांत बेलोऱ्यातून ‘टेक आॅफ’अमरावती : पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत. आणखी १५ उद्योग येणार आहेत. लवकर हे उद्योजक पाहणी करणार आहेत. यामध्ये यवतमाळच्या रेमंड उद्योगाही समावेश आहे. या उद्योगांना शासन सवलती देणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईला बैठक पार पडली असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.अमरावती व कोल्हापूर शहराचा विकास सारखाच झाला. परंतु कोल्हापूर विकासात खूप पुढे गेले, अमरावती मात्र माघारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात शहरात ६५० कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. विकास हा सार्वजनिक असावा यात कुठलेही राजकारण नसावे, असे पालकमंत्री म्हणाले. बेलोरा, अकोला व चंद्रपूर येथून एटीआर व अन्य विमानांचे ६ महिन्यांत ‘टेक आॅफ’ होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यासाठी १३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धावपट्टी बदलणे, टॉवर लाईन अन्यत्र हलविणे आदी कामे होणार आहेत. सिंचनाचे ४० प्रोजेक्ट मार्गी लागले आहेत. काही रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी विजेची समस्या होती ती मार्गी लागली आहे. आतापर्यंत १०० नवीन रोहीत्र बसविण्यात आलेले आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.‘पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान’ राज्यात पायलट प्रोजेक्ट ठरावा, ही संकल्पना‘पालकमंत्री पांदन रस्ते विकास अभियान’ याअंतर्गत जिल्ह्यातील अडीच हजार पांदन रस्ते निर्मितीचे ‘लक्ष्य’ आहे, जिल्ह्यात ४ हजार पांदण रस्ते आहेत. दोन आठवड्यांत २०० रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. जिल्ह्यात ५२५ तलाठी आहे. प्रत्येकांना ५ रस्त्याचे टार्गेट दिले आहे. यासाठी महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांची कार्यशाळा आपण घेतली. ग्रामीण भागात हे रस्ते ‘लाईफ लाईन’ आहे. हे सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून मातीकामच नव्हे तर खडीकरण करण्यात येणार आहे. हे अभियान राज्यासाठी पायलट प्रोजेक्ट ठरावा, अशी आपली संकल्पना असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. प्रत्येक नगरपंचायतींना देणार ६० लाख जिल्ह्यात नव्याने नगरपंचायती स्थापित झाल्यात. यांना शासनाचा निधी नसतो. यासाठी आपण वेगळी योजना आखली आहे. त्या अंतर्गत या नगरपंचायतींना विकासासाठी प्रत्येकी ६० लाख देणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखांचा विकास निधी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.आतापर्यंत ७८ हजार नागरिकांशी संपर्कपालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारी, रविवारी शासकीय विश्रामगृहात आपण नागरिकांना उपलब्ध असतो. आतापर्यंत ७८ हजार नागरिकांना भेटलो असून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे ना.पोटे यांनी सांगितले. ५० हजार युवकांना रोजगार निर्मितीजिल्ह्यात नव्याने उद्योग येत आहेत. यामध्ये किमान ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी कुशल व अकुशल कामगार तयार करणे, प्रशिक्षण देणे यासाठी ना. रणजित पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत, असे पोटे यांनी सांगितले.