शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अन् विवाह मंडपात नवरदेव पोहोचलाच नाही

By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST

लग्न जुळले. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख जवळ आली.

अमरावती : लग्न जुळले. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख जवळ आली.अन् ऐनवेळी वर पक्षांनी वधू पक्षाकडे हुंड्याची मागणी केली. विवाह मंडपात वधू पक्षाची मंडळी पोहचली. विवाहापूर्वी हुंडा मिळत नसल्याचे पाहून अखेर वर पक्षाने विवाह मंडपात येण्यास नकार दिला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक यशोदानगरनजीकच्या चैतन्य कॉलनी येथील रहिवासी काजल (काल्पनिक नाव) हिचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी हर्षवर्धन ऊर्फ हरीश अजाबराव सरदार या युवकाशी जुळला होता. ६ एप्रिल रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला. साखपुडा दरम्यान वधू पक्षाने वर पक्षाच्या संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या. परंतु ८ एप्रिल रोजी वर पक्षाच्या मंडळींनी वधू पक्षाकडे पुन्हा एक लाख रुपये हुंड्याची मागणी केली. ३0 मे रोजी काजल व हर्षवर्धनचा विवाह शहरातील एका मंगल कार्यालयात संपन्न होणार होता. त्यासाठी वधू पक्षाकडून सर्वत्र लग्नपत्रिका वितरित केल्या होत्या. ठरल्याप्रमाणे वधू पक्षाकडील संपूर्ण मंडळी विवाहस्थळी पोहचली. परंतु हुंडा मिळत नसल्याचे पाहून वर पक्षाकडील मंडळीने विवाह मंडपात पोहचण्यास नकार दिला. विनंती करुनही वर पक्षाची मंडळी त्यांच्या निर्णयावर ठाम होती. अखेर हताश मुलीच्या पित्याने फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी हर्षवर्धन सरदार, अजाबराव सरदार, बेबी सरदार, दादू सरदार, शुद्धोधन सरदार, दिलीप सरदार, देवगन सरदार, दादाराव वानखडे (सर्व रा.गोरेगाव, ता. मूर्तिजापूर ) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.