शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल दहावीच्या विद्यार्थ्यांची बल्ले बल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू होते. काही गुणी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षांची जाेरदार तयारीदेखील केली होती. मात्र, राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि गुणी विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. नववीचे गुण, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या  आधारे शाळांनी निकाल जाहीर केला असला तरी जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के, आठ विद्यार्थी नापास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने शिक्षणक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची ना शाळा, ना परीक्षा, थेट ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालाची टक्केवारी ही डोळे दीपवून टाकणारी ठरली. शाळांनी मूल्यांकनाच्या आधारे जणू विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव झाला आहे, अशी टक्केवारीची यादी सांगते. कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू होते. काही गुणी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षांची जाेरदार तयारीदेखील केली होती. मात्र, राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि गुणी विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. नववीचे गुण, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या  आधारे शाळांनी निकाल जाहीर केला असला तरी जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातून केवळ आठ विद्यार्थी नापास झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, तेही शाळांच्या मेहरबानीने उत्तीर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने ‘ढ’ विद्यार्थ्यांना कोरोना पावल्याचे चित्र आहे. दहावी कशीबशी उत्तीर्ण केली. आता अकरावी प्रवेश चांगल्या महाविद्यालयात कसे मिळेल, याचे नियोजन विद्यार्थ्यांसह पालकांनाही करावे लागणार आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण करणे मोठे जिकरीचे काम ठरणार आहे. आता सीईटीची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. 

यंदा दहावीचे पूनर्मूल्यांकन नाहीदहावीच्या निकालाने विद्यार्थी आनंदित आहेत. मात्र, यावर्षी पहिल्यांदा निकालानंतर पुनर्मूल्यांकन असणार नाही. परीक्षा झाली नाही. त्यामुळे पूनर्मूल्यांकन घेण्याचा प्रश्नच नाही. जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला असून, शाळांमार्फत केवळ आठ विद्यार्थ्यांचे मूल्यांकनासाठी गुण बोर्डाकडे पाठविण्यात आले नाही. 

श्रेणी सुधारण्याची संधीदहावीचा निकाल विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठरला आहे. मात्र, गुणी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निकाल अन्यायकारक मानला जात आहे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्याची संधी बोर्डाकडून देण्यात येणार आहे. पुढील दाेन परीक्षा देता येईल, असे बोर्डाने स्पष्ट केले.

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षादहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. आता राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्राधान्य असेल. सीईटी परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांंना दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश दिला जाईल. सीईटी परीक्षा १०० गुणांची असेल. ईंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान विषयावर १०० गुणांची ती घेण्यात येईल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या आधारे सीईटी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.  

दहावीच्या ऑनलाईन निकालाने साईट क्रॅशदहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होताच शिक्षण बोर्डाच्या साईटवर एकाचवेळी विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यामुळे संकेत स्थळ क्रॅश झाले. शुक्रवारी १ वाजता निकाल जाहीर होऊनही दुपारी २ पर्यंत विद्यार्थ्यांना नेमके काय झले, हे कळलेच नाही. एकाच वेळी १६ लाख विद्यार्थ्यांनी संकेत स्थळाला भेट दिल्याने ताण आल्याची माहिती आहे.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा असा पहिल्यांदाच अनुभव आला. शासनाने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीनुसार तो योग्यही होता. मात्र, आता शासनाने शाळा सुरू करण्याबाबत धोरण निश्चित करावे.- मधुकर अभ्यंकर, शाळा संचालक 

नववीचे गुण, दहावीचे अंतर्गत मूल्यमापन असे सूत्र अवलंबित एका कल्पकतेतून  निकाल जाहीर झाला, तो वास्तवाला धरून आले. यात गुणी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, असे म्हणता येणार नाही. कारण अकरावी प्रवेशासाठी सीईटी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा दुहेरी संगम निकालाने साधला आहे.- शरद तिरमारे, मुख्याध्यापक

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल