शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

नेहरूंनी जगभर ‘भिक्षा’ मागून देश जगवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:40 IST

देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे.

ठळक मुद्देव्याख्यान: सुरेश द्वादशीवार यांचे परखड मत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत नेहरूंनी जगभर भिक्षा मागून हा देश जगवला, समृद्ध केला, विविध क्षेत्रात उत्क्रांती घडवून त्याची पायाभरणी केली, असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात एका व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘नेहरू नेमके कसे होते?’ या विषयावर बोलताना द्वादशीवार म्हणाले, टाचणीही निर्माण न होणाºया देशात रेल्वेचे इंजीन निर्माण व्हायला लागले. पोलदाचे मोठे कारखाने, हिरकुड, भाक्रा-नांगल यासारखी धरणे उभी राहिली. नेहरूंचे कार्य इथवरच थांबले नाही, तर या देशात नेहरूंनी लोकशाही रुजवली. नेहरूंची धर्मनिरपेक्षता मूल्यधिष्ठित, तर पटेलांची धोरणात्मक होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा पंडित नेहरू ५८, तर सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. पटेलांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. मधुमेहाने त्यांचे शरीर जर्जर होऊन गेले होेते. त्याच्यावर पंतप्रधानपद लादणे योग्य नव्हते, असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.