शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

श्रीमंतांच्या वाहनाकडे दुर्लक्ष, गरिबाच्या रिक्षाकडे गेले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 00:19 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हा पोलिसांच्या कर्तव्यांचा भाग आहे.

पोलीस कारवाईचा दुजाभाव : वृध्दाने उधार पैसे घेऊन भरले न्यायालयात अमरावती : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हा पोलिसांच्या कर्तव्यांचा भाग आहे. मात्र, कारवाई करताना श्रीमंतांच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून गरिबांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच एक कारवाई शहर कोतवाली पोलिसांनी केली. एका वृध्द रिक्षा चालकाला १०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या वृध्दाजवळ पैसे नसताना त्याने दुसऱ्याजवळून पैसे घेऊन न्यायालयात भरले. ही कारवाई समर्थनीयच आहे; तथापि अनेक चारचाकी आणि दुचाकीचालक नियमांचे खुलेआम उल्लंघन करीत असूनही त्याच्याकडे डोळेझाक केली जाते, हे वेदनादायी आहे. कायदा हा सर्वासाठी सारखाच आहे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, ही बाब सुध्दा महत्त्वाची आहे. तेव्हाच वाहतूक नियमांविषयी जनजागृती व नियम पाळण्याची सवय अमरावतीकरांना लागू शकते. मात्र, शहरातील बहुतांश मार्गावर चारचाकी महागडी वाहने सर्रास उभी राहतात. नोपार्किंगमध्येही श्रीमंतांची वाहने उभी केली जातात. अशी अनेक उदाहरणे शहरातील विविध ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, मोठ्या वाहनावरील कारवाईचा आलेख हा कमी असल्याचेच आढळून आले आहे. त्यातुलनेत सर्वाधिक कारवाईचा बडगा दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. अशाच दुजाभावाचा प्रकार शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. जयस्तंभ चौकात वृध्द रिक्षाचालक सुरेश दामोधर गोसावी (५७,रा. मांगीलाल प्लॉट) याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्यांना १०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या रिक्षा चालकाजवळ दंडाची रक्कम भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्यांने एका अनोळखी युवकाजवळून घेऊन दंडाची रक्कम न्यायालयात जाऊन भरूनसुध्दा दिली. वाहतूक नियंत्रणाकडे पोलिसांचे लक्ष असल्याचेही सिद्ध होते. मात्र, शहरात असे शेकडो वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस पुढे येत नाही, असा प्रश्न या े उपस्थित झाला आहे. एका गरिब रिक्षावाल्याने वाहतूक नियम पाळला नाही, तो अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या ती बाब लक्षात आली नसावी, मात्र, सज्ञान श्रीमंत नियमांचे ज्ञान असतानाही वाहतूक नियम तोडत आहेत, मात्र, तरीसुध्दा पोलीस त्याच्यावर कारवाईस दुर्लक्ष का करतात, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. (प्रतिनिधी)