शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या शेंडगावकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:06 IST

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिलेल्या संत गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण दीड वर्षांपूर्वी शेंडगाव येथील भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शासकीय जागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

ठळक मुद्देविकास रखडला : पुतळा अस्वच्छ, परिसरात वाढले गाजरगवत

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिलेल्या संत गाडगेबाबांच्या पुतळ्याचे अनावरण दीड वर्षांपूर्वी शेंडगाव येथील भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शासकीय जागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावेळी शेंडगाव विकासासाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतरचा आराखडाही शासनदरबारी धूळखात आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनदरबारी पाठविण्यात आला होता. मुख्य सचिवांनी आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी आराखड्याचे प्रेझेंटेशन दिले. आराखड्याचा अंतिम चेंडू मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी याला मान्यता दिल्यास शेंडगाव विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्यसद्यस्थितीत शेंडगाव येथील १८ एकरांची शासकीय जागेत विकास होणार आहे. मात्र, बुधवार २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असतानाही येथील पुतळा परिसरात गाजरगवत वाढले आहे. शासनाने ती जागा खासपूर ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे. तेथे स्मृतिभवन बांधणे, नजीकच भुलेश्वरी नदी असल्याने १८ एकरांच्या जागेत कंपाऊंड वॉल तयार करणे, दोन प्रवेशव्दार करणे, भक्तनिवास बांधणे व गाडगेबाबांच्या दुर्मीळ वस्तुंची म्युझियम बांधणे अशा १८ कोटींचा विकास आराखडा विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत तयार केला. परंतु दीड वर्षांपासून संत गाडगेबाबांची जन्मभूमि शेंडगाव विकासापासून उपेक्षितच आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिसर स्वच्छ ठेवणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. पण, पुण्यतिथी असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. ज्या ठिकाणी गाडगेबाबांचा पुतळा बसविण्यात आला तेथील परिसराची गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबा कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शरद साबळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता केली. याठिकाणी संत गाडगेबाबा जन्मभूमी स्मारक समितीसुद्धा आहे. परंतु, या समितीचेही याकडे दुुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जन्मभूमिचा विकास कसा होईल, असा प्रश्न राज्यभरातील भाविकांना पडला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सदर प्रस्तावाला मंजुरी देऊन निधी द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अमरावती येथील समाधी मंदिराचाही विकास रखडला आहे. तत्कालीन शासनाने स्मृतिभवनाच्या इमारतीसाठी एक कोटी ६४ लाख रुपये दिले होते. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी बाबांच्या समाधी मंदिराच्या विकास आरखड्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरवाडी येथील विकास आराखडाही शासनाकडे पाठविला आहे.समाधी मंदिराचा विकास रखडलाअमरावती येथील समाधी मंदिरापुढील जागेत गाडगेबाबांचे स्मृतिभवन, बगीचा, धर्मशाळा व इतर विकासकामांसाठी शासनाकडे १८ कोटींचा विकास आराखडा दिला. त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. यापूर्वीच्या सरकारने १ कोटी ६४ लक्ष रुपये निधी दिला. आराखड्याची फाइल मंत्रालयात धूळखात पडल्याचे समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले.आराखड्याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होणार आहे.- रमेश बुंदिलेआमदार, दर्यापूरमी ग्रामपंचायतीचा आताच चार्ज घेतला आहे. यासंदर्भात सरपंचाशी चर्चा करून सांगतो. या ठिकाणची स्वच्छता करण्यात येणार आहे.- एस.आर. गोवारे,ग्रामसेवक, खासपूर