शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा समृद्ध वनवारसा जपण्याची गरज

By admin | Updated: March 21, 2016 00:02 IST

पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द अलीकडे अधिकच ऐकण्यात येतो.

वैभव बाबरेकर अमरावतीपर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द अलीकडे अधिकच ऐकण्यात येतो. जागतिक वनदिन साजरा करताना पर्यावरण संवर्धनाशी निगडित प्रत्येक घटकावर सर्वंकष विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मानवी वस्त्या जंगलांना खेटू लागल्या आहेत. ही बाब जंगलांसाठी धोकादायक ठरणारी आहे. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस शहरालगतच्या आॅक्सिजन बँकेवर मोठा परिणाम होत आहे. जिल्ह्यातील वनवैभव मानवी वस्त्यांच्या विळख्यात सापडले आहे. हळूहळू या वनवैभवाचा ऱ्हास होत चालला आहे. जागतिक वनदिन साजरा करताना जिल्ह्याचे हरवलेले वनवैभव परत आणण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. चाणक्य विचारसरणीत तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यात वनसंवर्धनाला अतिशय महत्त्व होते. परंतु आधुनिक काळात मानवाची वनांचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढत गेली. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जंगलतोड, औद्योगिकरण, वनजमिनीवर अतिक्रमण, गुरांची अधिक संख्या व कुरणक्षेत्राच्या जागा मनुष्य वस्त्यांनी बळकावल्यामुळे वनांवर मोठा ताण वाढला आहे. जंगलाचे कमी होणारे प्रमाण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे नात ेअतिशय घट्ट आहे. वने आहेत म्हणून नद्यांना पाणी आहे. वने आहेत म्हणून मानवाला प्राणवायू मिळतो. म्हणजेच वनांमुळेच मानव व प्राणी जीवन जगू शकताहेत. जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र- ३,५७७ चौरस किमी असून त्यामध्ये पोहरा, मालखेड राखीव जंगल आहे. या जंगलात खैर, हिवर, पळस, बोर आदी विविध प्रकारचे वृक्ष आढळून येतात. इतकेच नव्हे तर वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, अस्वल, गवा, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट हे वन्यपशूदेखील या जंगलात आढळून येतात. जिल्ह्यात शुष्क पानगळी प्रकारचे अरण्य असून पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व गुगामल राष्ट्रीय उद्यान तसेच महेंद्री व पोहरा-मालखेड सारख्या राखीव जंगलात वनसंपदा टिकून आहे. मात्र, मागील काही वर्षांत जंगले शहरीकरणाच्या कचाट्यात सापडली आहेत. अमरावती जिल्ह्याला वनांचा समृध्द वारसा लाभलाय. तो कायमस्वरुपी टिकविणे मानवाच्या हाती आहे. जागतिक वन दिन सारा करताना वनसंरक्षणाचा संकल्प करायलाच हवा.

वृक्षतोडीचाही परिणाम वनसंवर्धन व वृक्षलागवड हे फक्त वनविभागाचेच काम नसून नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. ‘एक व्यक्ती एक झाड’ हा उपक्रम राबविल्यास मोफत उपलब्ध असलेली आॅक्सिजन बँक समृध्द होईल- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, अमरावतीसातत्याने होणारी वृक्षतोड व वाढत्या मानवी वस्त्या जंगलांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून नागरिकांनी निसर्गाचे जतन करण्यात पुढाकार घ्यावा.- स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक.