शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उत्पादन खर्चावर हमीभाव हवाच!

By admin | Updated: February 2, 2015 22:58 IST

ऊन, वारा, पाऊस व वादळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत आजवर कागदावरच राहिली आहे. यंदातर हमीभावापेक्षाही ५०० रुपयांनी

गजानन मोहोड - अमरावतीऊन, वारा, पाऊस व वादळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत आजवर कागदावरच राहिली आहे. यंदातर हमीभावापेक्षाही ५०० रुपयांनी कमी भावाने कापसाची मागणी होत आहे. विभागात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न होते. मात्र कापसाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यावर्षीचे दर ठरविण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने राज्यातील कृषी विद्यापीठासह पणन तज्ज्ञांनी काढलेल्या पीक उत्पादन खर्चाची माहिती घेतली आहे. या अनुषंगाने पिकाच्या आधारभूत किंमती फेब्रुवारी महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांचे आधाभूत दर फेब्रुवारी महिन्यात घोषित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात येणारा उत्पादन खर्च व मिळणारा हमी भाव यामध्ये फार मोठी तफावत असल्याने प्रमुख पीक असणाऱ्या कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाचे संरक्षण कवच मिळण्याची आवश्यकता आहे. शेतमालास योग्य किंमतीचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाद्वारा दरवर्षी हमीभाव जाहीर केल्या जातात. खरीप हंगामाच्या चार महिने अगोदर आधारभूत हमीदराची शिफारस केंद्र शासनास केली जाते. मागील वर्षी २६ फेब्रुवारीला आधारभूत हमीदराची शिफारस करण्यात आली होती. मात्र यावर्षी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने १५ जानेवारीला दिल्ली येथे आढावा बैठक घेतल्याने फेब्रुवारी २०१५ मध्ये आधार हमीभाव घोषित होण्याची शक्यता आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी २०१३-१४ व २०१४-१५ या खरीप हंगामातील उत्पादनाचे आकडे विभागीय सहसंचालकांच्या अधिनस्त शेतभाव समिती कक्षाकडे पाठविली व त्यांनी कृषी मूल्य आयोगाकडे पाठविली आहे. राज्याचे कृषी प्रधान सचिव, कृषी आयुक्त, संचालक विस्तार व प्रशिक्षण, पणन संचालक, मुख्य सांख्याकी उपसचिव पणन, आणि कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य आयोगाच्या तज्ज्ञांकडून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे आढावा घेण्यात आला आहे. यापूर्वीचे आधारभूत दराचे भाव पाहिल्यास कृषी मूल्य आयोगाच्याच शिफारसीनुसार केंद्र शासनाने आधारभूत किंमत जाहीर केलेल्या दिसून येते. यंदा उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.