शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शांतता नांदण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: August 24, 2016 00:04 IST

देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत.

जमाअते इस्लामी हिंद : देशात शांती, मानवता अभियानाला सुरुवातपरतवाडा : देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत. ही शांती सद्भावना सतत नांदावी यासाठी आपण सर्वांनी अविरत प्रयत्न ठेवणे गरजेचे आहेत. जातीयतेची तेढ निर्माण करून आपली पोळी शेकणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसाला माणूस बनविण्यासाठी कुठलेच पुस्तक किंवा अभ्यासक्रम नाही. ते आत्मसात करूनच माणूसपण मिळत असल्याचे प्रतिपादन उर्दू हिंदी मराठीचे गाढे अभ्यासक रफीक पारणेर यांनी केले.देशभर २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर २०१६ पर्यंत जमाअते इस्लामी हिंदतर्फे दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह मोठ्या शहरामध्येसुद्धा सद्भावना फेरी, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचा सहभाग असून त्यानिमित्त परतवाडा शहरात सोमवारी एका पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पत्रपरिषदेला मतीन अचलपुरी, इब्राहिम साहेब अकोट, रफीक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. समज गैरसमजातून दंगे होतात ते होऊ नये, मानवता जागावी, व्यसने सुटावी आणि आपल्या धर्माच्या शिकवणीचा आदर करीत सर्वत्र शांतता नांदावी, चांगले वातावण तयार होऊन सर्वांनी आनंदात जगावे, यासाठी मोठ्या प्रमाणात कायम प्रयत्न केले जात आहे. सर्वांनी मिळून त्यात सहभाग घेण्याचे आवाहन उपस्थितांनी पत्रपरिषदेत केले.जवळपास तीन कोटी लोकांपर्यंत या पंधरवाड्यात पोहोचण्याचा मानस असून देशभर शांती आणि सद्भावनेचा संदेश देत कार्यक्रम साजरे केले जाणार आहे. तुकोबांची गाथा, मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा संदेश, गीता, कुराणातील ओव्या सांगत एकतेसाठी हा मंच असल्याचे ते म्हणाले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर मतीन अहेमद, अलताफ रहमान, कमर इकबाल, अमिर इंजिनिअर, मो. जुबेर, जुबेर अहेमद खान, फराज अहेमद खान आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)