शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

शांतता नांदण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: August 24, 2016 00:04 IST

देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत.

जमाअते इस्लामी हिंद : देशात शांती, मानवता अभियानाला सुरुवातपरतवाडा : देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत. ही शांती सद्भावना सतत नांदावी यासाठी आपण सर्वांनी अविरत प्रयत्न ठेवणे गरजेचे आहेत. जातीयतेची तेढ निर्माण करून आपली पोळी शेकणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसाला माणूस बनविण्यासाठी कुठलेच पुस्तक किंवा अभ्यासक्रम नाही. ते आत्मसात करूनच माणूसपण मिळत असल्याचे प्रतिपादन उर्दू हिंदी मराठीचे गाढे अभ्यासक रफीक पारणेर यांनी केले.देशभर २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर २०१६ पर्यंत जमाअते इस्लामी हिंदतर्फे दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह मोठ्या शहरामध्येसुद्धा सद्भावना फेरी, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचा सहभाग असून त्यानिमित्त परतवाडा शहरात सोमवारी एका पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पत्रपरिषदेला मतीन अचलपुरी, इब्राहिम साहेब अकोट, रफीक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. समज गैरसमजातून दंगे होतात ते होऊ नये, मानवता जागावी, व्यसने सुटावी आणि आपल्या धर्माच्या शिकवणीचा आदर करीत सर्वत्र शांतता नांदावी, चांगले वातावण तयार होऊन सर्वांनी आनंदात जगावे, यासाठी मोठ्या प्रमाणात कायम प्रयत्न केले जात आहे. सर्वांनी मिळून त्यात सहभाग घेण्याचे आवाहन उपस्थितांनी पत्रपरिषदेत केले.जवळपास तीन कोटी लोकांपर्यंत या पंधरवाड्यात पोहोचण्याचा मानस असून देशभर शांती आणि सद्भावनेचा संदेश देत कार्यक्रम साजरे केले जाणार आहे. तुकोबांची गाथा, मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा संदेश, गीता, कुराणातील ओव्या सांगत एकतेसाठी हा मंच असल्याचे ते म्हणाले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर मतीन अहेमद, अलताफ रहमान, कमर इकबाल, अमिर इंजिनिअर, मो. जुबेर, जुबेर अहेमद खान, फराज अहेमद खान आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)