शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

१० किलो तूर डाळ हवी? पत्रिका दाखवा!

By admin | Updated: October 20, 2015 00:11 IST

आप्तेष्टांना कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण पत्रिकेद्वारे देण्याची पध्दत आहे.

ग्राहकांची कुचंबणा : तूर डाळ प्रति किलो २२५ रुपये, ग्राहक हैराणप्रदीप भाकरे अमरावतीआप्तेष्टांना कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण पत्रिकेद्वारे देण्याची पध्दत आहे. मात्र, आता हीच पत्रिका दाखवून तुम्हाला तूर डाळीची खरेदी करावी लागणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण, हे खरे आहे. सद्यस्थितीत १० ते १५ किलो तूर डाळ खरेदी करायची असेल तर कॅम्प स्थित ‘डी-मार्ट’ एवढी डाळ खरेदी करण्याचे कारण विचारले जाते. सामान्य ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दरात तूर डाळ मिळावी व डाळीची साठेबाजी होऊ नये, असा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते आहे. ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या तूर डाळीचे दर गगनाला भिडले आहे. किरकोळ बाजारात ६ महिन्यांपूर्वी ८५ ते १०० रुपये किलोप्रमाणे उपलब्ध असलेली तूर डाळ चक्क २०० ते २२५ रुपयांत विकली जात आहे. दरदिवशी तुरीचे दर वाढत असल्याने किमान १० किलो डाळ घरी असावी, या विचाराने ‘डी-मार्ट’कडे जाणाऱ्या ग्राहकांचा ‘फक्त २ किलो’च्या अटीमुळे हीरमोड होत आहे. अटी-शर्तीत ग्राहकांचा हिरमोडअमरावती : किरकोळ बाजारात फटका डाळीचा दर प्रती किलो २२५ रूपये असून हीच डाळ ‘डी-मार्ट’ मध्ये १८३ रुपये दराने उपलब्ध आहे. ‘डी-मार्ट’मध्ये १६० रूपये प्रती किलोपासून तूर डाळ उपलब्ध असल्याने येथे ५ ते ७ किलो डाळ एकाचवेळी खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. मात्र, येथे अटी घालून डाळीची विक्री होत असल्याने ग्राहकांचा हिरमोड होत आहे. ३ दिवसांपासून ‘वॉलमार्ट’मध्ये तूरडाळ उपलब्ध नव्हती. घाऊक मार्केटमध्येही तूर डाळीची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. दसरा-दिवाळीच्या कालावधीत तूर डाळीचा भाव प्रती किलो २२५ रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या भोजनातून ‘वरण’ हद्दपार झाले आहे. तूर डाळीच्या वाढत्या दरामागे व्यापाऱ्यांची खेळी असून साठेबाजांवर नियंत्रण नसल्याने ग्राहकांची परवड होत आहे. सध्या किरकोळ बाजारात १९० ते २२५ रु. प्रति किलो दराने तूर डाळीची विक्री होत आहे. मागिल १५ दिवसांत तूर डाळीच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाल्याचे विक्रेते सांगतात. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूर डाळीसोबत मूग, उडिदाच्या डाळीने उच्चांक गाठला आहे. दरम्यान एखाद्या विक्रेत्याला ठराविक प्रमाणात तूर डाळीची विक्री करता येते का? अशी मर्यादा घातली जाणे अधिकृत आहे का, याबाबत बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षकांशी संपर्क होऊ शकला नाही. सणासुदीला डाळींचे वाढलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने साठ्याच्या मर्यादा घातले आहे. नफेखोरांवर कारवाई करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र, जिल्हा पुरवठा प्रशासनाला तसे निर्देश न मिळाल्याने तूर डाळीच्या साठेबाजीवर नियंत्रण उरलेले नाही. काही बड्या व्यापाऱ्यांनी मोठा साठा करून ठेवल्याचा आरोपही किरकोळ विक्रेते करीत आहेत. बडनेरा रस्त्यावरील ‘भारती वॉलमार्ट’मध्येही गेल्या ३-४ दिवसांपासून तूर डाळ उपलब्ध नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तूर पोहोचली १२,२०० वरबाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल १२,२०० रूपयांचा उच्चांकी दर मिळत आहे. लाल तुरीला किमान १३ हजार ते १३, ८१६ रुपय भाव मिळाला. गजर तूर ९ हजार, कमला १०,५०० रुपये दराने मिळत आहे. दोन महिन्यानंतर शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर दर पाहणे औत्सुक्याचे ठरेल.