शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘एनडीआरएफ’ची मदत, बाकी रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:54 IST

यंदा २ लाख २२ हजारांपैकी दोन लाख हेक्टरमधील कपाशी गुलाबी बोंड अळीने उद्ध्वस्त झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल शासनाला सादर झाला.

ठळक मुद्देकापूस उत्पादकांची परवड : विमा, बियाणे कंपन्यांची मदत गुलदस्त्यात

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा २ लाख २२ हजारांपैकी दोन लाख हेक्टरमधील कपाशी गुलाबी बोंड अळीने उद्ध्वस्त झाल्याचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल शासनाला सादर झाला. २ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १८३ कोटींची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. वास्तविक, शासनाने कापूस उत्पादकांना हेक्टरी ३० हजार ८०० रुपयांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात मदतीचा विचार केवळ ‘एनडीआरएफ’चाच होत असल्याने पीकविम्यासह बियाणे कंपन्यांद्वारा भरपाईचे काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.यंदा बीटी तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच शेतकऱ्यांवर संकट ओढावले. हजारो हेक्टरमधील कपाशीवर नांगर फिरविला जात आहे. शेतकरी आक्रमक झाल्यानेच शासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे आदेश २३ डिसेंबरला दिलेत. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंड अळीने बाधित क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत जिरायती कपाशीला हेक्टरी ३० हजार ८००, तर बागायती कपाशीला ३७ हजार ५०० रुपये हेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. कपाशीच्या पंचनाम्याअंती जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रातील कपाशी बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांना शासनघोषणेप्रमाणेच मदत मिळायला पाहिजे. मात्र, शासनस्तरावर पीक विम्यासह बियाणे कंपन्यांकडून अपेक्षित भरपाईसाठी शासनस्तरावर हालचाल सुरू नसल्याने शेतकऱ्यांमध्ये या मदतीविषयी संभ्रम आहे.कंपन्यांची भरपाई हा दावा खोटायंदा हजारो तक्रारी झाल्यात. काही तक्रारी पोलीस ठाण्यातही झाल्यात. पाच कंपन्यांचे बियाणे सदोष असल्याने सीबीआय चौकशीची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच केली. या पार्श्वभूमीवर बियाणे कंपन्या कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत हेक्टरी १६ हजारांची भरपाई देणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदर भरपाईच्या शासनघोषणेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमच आहे.‘एनडीआरएफ’ची मदत मिळणार; बाकीचे काय?केंद्राने एप्रिल २०१५ मध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषामध्ये बदल केले. ते राज्यालाही बंधनकारक आहेत. या निकषानुसार कीड व रोगांमुळे पिकांचे ३३ टक्क््यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत केंद्रीय आपदा निवारण कोषमधून दिली जाते. पंचनाम्याअंती जिल्ह्यात १८२ कोटी ६० लाख मिळणार; मात्र पीक विम्यासह बियाणे कंपन्यांकडून मिळणाऱ्या भरपाईचे काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.विम्याची भरपाई ही तद्दन दिशाभूलबोंड अळीच्या बाधित क्षेत्राला पीक विम्याची हेक्टरी आठ हजारांची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले असले तरी पीक विमा उंबरठा उत्पन्नावर जाहीर होतो. त्यासाठी आता तालुका हा घटक गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणीच मिळणारी भरपाई सारखी कशी राहील, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. शासनाने विधिमंडळ अधिवेशनात केवळ वेळ मारून नेली व पुन्हा एकदा शेतकºयांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.