शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

राष्ट्रवादीत पद नाही पत मिळेल

By admin | Updated: June 30, 2016 00:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षबांधणीला प्राधान्य दिले आहे.

मेळावा : प्रफुल्ल पटेल, अरुण गुजराथी, अनिल देशमुखांची उपस्थितीअमरावती: राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षबांधणीला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमिवर बुधवारी आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षच पर्याय असल्याचे निक्षून सांगितले. सर्वांना पदे मिळणे शक्य नसले तरी पत नक्कीच मिळेल, ही बाब जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी यांनी स्पष्ट केली. गुजराती यांनी ‘धूल चेहरे पर और वो आर्इंना पोछते है’ असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बुधवारी राष्ट्रवादी काँगे्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, वसुधा देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, जिल्हा प्रभारी वसंत घुईखेडकर, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, राजकुमार पटेल, जि. प. सभापती वैशाली विघे, नंदू वासनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, गणेश खारकर, प्रदीप राऊत, राजेश शिरभाते, निलिमा महल्ले, अनिल ठाकरे, सुनील काळे, संतोष महात्मे, ऋषिकेश वैद्य, प्रल्हाद सुंदरकर, गणेश राय, विनेश आडतिया, गणेशदास गायकवाड, गजानन रेवाळकर आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रारंभी नवनियुक्त खा. प्रफुल पटेल यांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात भलामोठा हार घालून सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रभारी अरुण गुजराथी यांनी शेरो शायरीतून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणताना राष्ट्रवादीचे निर्णय आता मुंबईत नव्हे तर विदर्भातच होतील, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे डंडे खा पण राष्ट्रवादी वाढवा असा सल्ला कार्यकर्त्यांना त्यांनी दिला. यावेळी खा. प्रफल पटेल यांनी राष्ट्रवादी विदर्भात क्रमांक १ चा पक्ष उभा राहील. नगरसेवक ते खासदार, मंत्री असा माझा प्रवास असला तरी ही देण शरद पवार यांची असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)'एकला चलो'ची हाकराष्ट्रवादीने काँग्रेससोबत आता मैत्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अथवा आमदारकीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असे संकेत नेत्यांनी दिले आहे. ‘एकला चलो’मुळे कार्यकर्त्यांना भरपूर वाव, संधी सुद्धा मिळणार आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, ही ओरड थांबणार आहे.