शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

'नवाब’ ‘कॅटल लिफ्टर’

By admin | Updated: January 19, 2017 00:03 IST

कळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलातून स्थलांतरण करून पोहरा-मालखेड जंगलात आलेल्या नवाब वाघामुळे अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत.

वन्यप्राणी सैरभैर : शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारावैभव बाबरेकर अमरावतीकळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलातून स्थलांतरण करून पोहरा-मालखेड जंगलात आलेल्या नवाब वाघामुळे अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत. कातलाबोडीतील वाघीणीचा हा छावा ‘कॅटल लिफ्टींग’मध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना जंगलात चराईकरिता नेऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. कातलबोडीतील वाघिणीचा दोन ते अडीच वर्षांचा छावा तब्बल १३५ किलोमीटरचे अंतर पार करून पोहरा-मालखेड जंगलात वास्तव्यास आला आहे. तो जंगलात मुक्त संचार करीत असून त्याचे अस्तित्व वनविभागाच्या टॅ्रप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहराच्या सीमेपर्यंत तो फेरफटका मारत असल्याचे त्याच्या पायाच्या आढळलेल्या ठशांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमरावती-चांदूररेल्वे मार्गावरील जंगलातील नवाबच्या मुक्त संचाराने अन्य वन्यप्राणी अस्थिर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने जंगलात गस्त वाढविली असून या गस्तीदरम्यान जंगलात अन्य वन्यप्राणी बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. एरवी जंगलात दृष्टीस पडणारी निलगाय, हरिण, रानडुक्करांसह अन्य वन्यप्राणी दिसेनासे झाल्याचे वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वाघ आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जंगलात फिरत असल्याची चाहुल अन्य वन्यप्राण्यांना लागल्यामुळे या प्राण्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शिवाय नवाब हा कातलबोडीत ‘कॅटल लिफ्टर’ म्हणून ओळखला जातो. नवाबने तेथील अनेक जनावरे फस्त केल्याचेही सांगण्यात येत आहे.या जंगलाशेजारी अनेक गावे असून तेथील शेतकऱ्यांकडे पशूधनाची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जनावरांना जंगलात चराईसाठी नेल्यास त्यांच्यावर नवाबकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांना जंगलात चराईकरिता सोडू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नवाबच्या दहशतीमुळे वन्यप्राणी तुर्तास शांत झाल्याचे दिसत आहे. वनविभाग अलर्ट असून बारीकसारिक हालचाली देखील टिपल्या जात आहेत. हिलटॉप पॉर्इंटजवळचार बिबटअमरावती-चांदूररेल्वे मार्गावरील हिलटॉप पॉईन्टजवळच नवाबच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याच परिसरात तीन बिबटांचेही वास्तव्य सिद्ध झाले आहे. मंगळवारी वनविभागाला यापरिसरात बिबटांचे तीन छावे दृष्टीस पडले असून त्या परिसरात बिबट मादी असल्याचेसुद्धा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाण्यापूर्वी वनविभागाची पूर्व परवानगी घेणे आता गरजेचे आहे. नवाब वाघाचा जंगलात अधिवास सिद्ध झाला आहे. या वाघाच्या भीतीमुळे जंगलातील अन्य प्राणी दडून बसले असून जंगलातील गस्तीदरम्यान हा अनुभव आला आहे. - एच.व्ही.पडगव्हाणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी