शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दुष्काळ, पाणीटंचाईसंदर्भात नवनीत राणांची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 01:23 IST

जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाईसाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात बैठक लावण्याची सूचना नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सोमवारी बैठक आयोजित केली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा आढावा : उपाययोजना अन् तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाईसाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात बैठक लावण्याची सूचना नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सोमवारी बैठक आयोजित केली आहे.नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्या विजयाचा जल्लोष जिल्हाभरात सुरू आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची व चाहत्यांची दररोज गर्दी होत आहे. दररोज त्यांची रॅलीदेखील निघत असताना जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाई या विषयांवर आपण गंभीर असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाला दाखवून देत आगामी वाटचालीचे संकेत दिले आहे.प्रचारादरम्यान जिल्ह्यातील या भयावह स्थितीची जाणीव खासदार राणा यांना झाली. त्यामुळे यासंदर्भात काय उपाययोजना सुरू आहे, त्या कामांवर तरतूद करण्यात आलेली आहे काय? याबाबतचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लावली आहे. या बैठकीला आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनादेखील बोलाविण्याच्या सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळस्थिती आहे. भूजलाचे पुनर्भरण न झाल्यामुळे सद्यस्थितीत ३०० वर गावांत जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन महिने आचारसंहिता सुरू असल्याने पुरेशा प्रमाणात उपाययोजना झालेल्या नाहीत, किंबहुना जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्यामुळेच जलसंकटाची तीव्रता वाढली आहे.