शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांनी केली चौकशी समिती बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:17 IST

अमरावती : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने समिती बदलून नव्या समितीमार्फत चौकशी करून न्याय प्रदान ...

अमरावती : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने समिती बदलून नव्या समितीमार्फत चौकशी करून न्याय प्रदान करावा, अश मागणी खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांना पत्राद्वारे केली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रानुसार, वनबल खात्याचे प्रमुख पी. साईप्रसाद यांनी ३० मार्च २०२१ रोजी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी स्वतंत्रपणे नऊ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीचे अध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव यांच्याकडे दोन महिन्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या समितीने चौकशीच्या अनुषंगाने तीन उपसमितीचे गठन केले होते. मात्र, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत एम.के. राव यांनी केवळ अनास्था दर्शविली. ना चौकशी, ना तपासणी केवळ कागदोपत्री समितीचे कामकाज चालले. अखेर राव यांनी ३१ ऑगस्ट रोजी निवृत्तीच्या दिवशी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी थातुरमातुर अहवाल सादर केला. निलंबित विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या बचावासाठी पुढाकार घेण्यात आला. एवढेच नव्हे तर दीपाली यांच्या आत्महत्यावरही समितीचे अध्यक्ष राव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून महिला अधिकाऱ्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे दीपाली यांच्या मृत्यूनंतरही न्याय मिळण्यासाठी वनबल खात्याने नवीन समिती गठित करावी, असे राज्य शासनाला आदेशित करावे, अशी मागणी खासदार राणा यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

------------------

चौकशी समितीत श्रीनिवास रेड्डींसोबत काम अधिकारी कसे?

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या दुर्लक्षाने निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांची मग्रुरी वन खात्यात वाढली होती. दीपाली यांचा मानसिक छळ, अपमान करणे, अर्वाच्य भाषेचा वापर असा प्रकार सातत्याने घडत होता. याबाबत दीपालीने रेड्डी यांना भेटून अनेकदा सांगितले. मात्र, ‘तेलंगणा’ आयएफएस लॉबी कशी सुरक्षित राहील, याचे नियोजन रेड्डी यांनी केले. परिणामी दीपाली यांना त्रस्त होऊन आत्महत्या करावी लागली, हे तिने सुसाईड नोटद्वारे स्पष्ट केले आहे तसेच वन खात्याने गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीतील अधिकारी हे रेड्डी यांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे समिती बदलावी आणि सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीचे गठण करावे, अशा मागणीचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी केले.