शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पावसामुळे जंगलात संचारले नवजीवन

By admin | Updated: June 20, 2015 00:36 IST

पावसामुळे जंगलातील अन्नसाखळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

पक्ष्यांसाठी खाद्य : वन्यप्राणी, कीटकांची सुप्तावस्था संपलीवैभव बाबरेकर अमरावतीपावसामुळे जंगलातील अन्नसाखळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मुबलक खाद्यामुळे पक्षी, वन्यप्राणी व कीटकांची सुप्तावस्था संपली आहे. त्यामुळे जंगलातील जीवन सुखावले असून प्रफुल्लीत वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात हिरवागार निसर्ग कोरडा पडू लागतो. तलाव व नैसर्गिक पाणवठ्यावरील पाणीसाठा संपुष्टात येतो. अशावेळी निसर्ग कात टाकत असल्याचे चित्र असते. मात्र, मान्सूनचा पाऊस पडताच निसर्ग पुन्हा हिरवागार दिसू लागतो. तसेच वन्यप्राणी व कीटकांच्या जीवनातील सुप्तावस्था संपायला लागते. आता मान्सूनचा पाऊस पडला असून पशू-पक्ष्यांसाठी अन्न व खाद्य मुबलक प्रमाणात मिळू लागले आहे. सुप्तावस्थेत गेलेल्या कीटकांनी पुन्हा जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. कीटकांपासून वन्य प्राण्यापर्यंतची अन्नसाखळी निर्माण झाल्याने पुन्हा जंगल समृध्द झाले आहे. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातीची संख्या अचानक वाढू लागली आहे. उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या कीटकांनी पाणी पडताच जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. त्यांचे कोष पुन्हा सक्रिय झाले आहेत. गवतावर अवलंबून असणाऱ्या प्रजाती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. मुंग्या, माकोडे व किड्यांची संख्या वाढल्याने पक्ष्यांनाही मुबलक प्रमाणात अन्न मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश पक्षी घरटी बांधतात व पावसाळा सुरु होताच त्यात अंडी देतात. पिल्ले निघाल्यानंतर त्यांनाही मुबलक अन्न मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. फुलपाखरे, साप, बेडूक, सरडे, शेंद्री किडे, कोळी आदी कीटकांची संख्या वाढू लागली आहे. वृक्षवेली वाढू लागल्याने पक्षी व वन्यप्राण्यांनाही मुबलक अन्न मिळू लागले आहे. पावसामुळे जंगलातील जीवन प्रफुल्लीत झाल्याचा अनुभव अनेक निसर्गपे्रमींनी घेतला आहे. पावसामुळे जंगलातील जीवनाचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होत आहे. कीटक, पक्षी व वन्यप्राण्यांना मुबलक अन्न मिळाल्यावर त्यांच्या प्रजाती वाढू लागल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातींमुळे जंगलाची सुप्तावस्था नाहीशी झाली आहे.- यादव तरटे,पक्षी अभ्यासक.पाऊस पडताच लहान कीटकांपासून तर मोठ्या वन्यप्राण्यांची अन्नसाखळी सुरळीत होते. त्यांना मुबलक अन्न मिळल्यामुळे त्यांचा जीवनप्रवास सुरू होतो. पाणी व अन्न हेच जंगलातील जीवन फुलविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. - स्वप्निल सोनोने, वन्यजीव अभ्यासक.