शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामोन्नतीसाठी राष्ट्रसंतांची हाक, गावागावासी जागवा

By admin | Updated: April 30, 2016 00:16 IST

ग्रामोन्नतीच्या दृष्टीने सर्वांगीण ग्राम विकासाची सूत्रबद्ध, आदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना ग्रामगीतेसारख्या ...

ग्रामजयंती : नव्या युगाच्या निर्मितीसाठी राष्ट्राला दिला मंत्रअमरावती : ग्रामोन्नतीच्या दृष्टीने सर्वांगीण ग्राम विकासाची सूत्रबद्ध, आदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना ग्रामगीतेसारख्या आमूलाग्र परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या चिंतनशील, संवेदनशील महाकाव्यातून ४१ विषय विधायक, क्रियात्मक स्वरुपात प्रगट करणाऱ्या युगमानव, द्रष्टापुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस 'ग्रामजयंती' म्हणून ३० एप्रिल २०१६ ला संपूर्ण भारतभर गावागावातून अनेकानेक विधायक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येत आहे.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस राष्ट्रसंतांनी संस्थापित केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या प्रचारक, कार्यकर्ते व त्यांच्या प्रेमीजनांनी साजरा करण्याचे सूतोवाच राष्ट्रसंतांसमोर केले. तेव्हा मार्मिकपणे राष्ट्रसंतांनी भावना सर्वांसमोर मांडल्या. राष्ट्रसंत म्हणाले-''मित्रांनो ! तुकडोजींची जयंती साजरी करण्याची प्रथा मला अमलात आणू द्यायची नाही. माझा जन्मदिवस साजरा करण्याचे हे नवे खूळ मंडळाने निर्माण करणे म्हणजे माझे मरण चिंतनेच होय. मी आपणाला आधी सांगू ठेवतो की 'ग्रामजयंतीच्या' निमित्ताने तुकड्याबुवांची पूजा करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमचे माझे जमणार नाही. मी माझ्या मनात मानव मात्राचे उत्थान करणारी देवता शोधत होतो. यादृष्टीने विचार करू लागलो तेव्हा मानवजातीच्या कल्याणाचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने 'ग्रामदेवता' ही मला योग्य वाटली. मला गावा-गावात विठ्ठल रखुमाईचे दर्शन होत आहे. मुले-बाळे पुंडलिकांच्या रुपात दिसताहेत. ग्रामस्थांच्या वेदनांचं संवेदन मी प्रत्यक्ष अनुभवित आहे. अशा माझ्या ग्रामदेवतेला मी सेवेचं फूल वाहिलेलं आहे. मंदिरात आता देव राहिलेला नसून तो घरा घरातून, झोपड्या-झोपड्यांतून काय घडत आहे हे पाहण्यासाठी निघाला आहे. याच विशाल भावनेने मी माझ्या जन्म दिवसाला ग्रामजयंती म्हटले आहे. ग्रामजयंती ही देशातील प्रत्येक नगारिकांपर्यंत पोहचली पाहिजे, असा माझा मानस आहे. ग्रामोत्थानाच दीर्घचिंतन नव्या युगाच्या नवनिर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून एक नवा मंत्र ग्रामजयंती निमित्ताने देशाला दिला. वं.राष्ट्रसंतांचा श्वास-न-श्वास अहोरात्र गावांना तीर्थरुप बनविण्यासाठीच झटला. तो थकला नाही की भागला नाही.गावात रामधून निघाली पाहिजे. गाव स्वच्छ दिसल पाहिजे, पांदण, नाल्या स्वच्छ दिसल्या पाहिजे. गावात, चरसंडास असले पाहिजे. गुड्या-तोरणांनी गाव सजलं पाहिजे. या विधायक कार्यक्रमाद्वारे माझी ग्रामजयंती साजरी व्हावी हा राष्ट्रसंतांचा अट्टाहास होता. यासाठी राष्ट्रसंत म्हणतात- ''गाव हे विश्वाचे ब्रह्मांडाचे घटक आहे. म्हणून मी स्वत:च्या कार्यक्रम सोहळयाला ग्रामजयंतीचे स्वप्न दिले आहे. गाव सजले चांगले झाले की स्वच्छ बनले सर्वांगनी सुखी समृध्द झाले तर मला माणे पूजन झाल्या सारखे वाटते. जसे माझ्या शरीराला आंघोळीची गरज आहे तसेच तुम्ही दररोज नव्हे तर आठ दिवसातून एकदा तरी ग्रामसफाई करा. गावाला नीटनेटके ठेवा, ध्यान-प्रार्थना करा. हे आत्म्याचे अन्न आहे, अशी माहिती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी रुपराव वाघ यांनी दिली.