शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

राष्ट्रीयीकृत बँकांचा पीककर्ज वाटपास ठेंगा

By admin | Updated: May 26, 2017 01:40 IST

यंदाचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. खरीप कर्जवाटपास बँकांचे सहकार्य नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १३ टक्केच कर्जवाटप झाले आहे.

खरीप हंगाम तोंडावर : केवळ तीन टक्केच कर्जवाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. खरीप कर्जवाटपास बँकांचे सहकार्य नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १३ टक्केच कर्जवाटप झाले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृ त बँकानी केवळ तीन टक्केच कर्जवाटप केले आहे. तुरीचे चुकारे महिनाभर होत नाही. खरिपासाठी बी-बियाणे, खते आदींची तजवीज करायची आहे. मात्र, कर्जवाटपास बँकांनी हात वर केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाख ८० हजार रूपयांचा लक्षांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला ५१६ कोटी ६० लाख, राष्ट्रीयीकृत बँकाना १,०६२ कोटी ६ लाख ५४ हजार व ग्रामीण बँकाना १३ कोटी ८८ लाख २६ हजार रूपयांचा लक्षांक दिला आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत यासर्व बँकांनी १९ हजार ४७२ शेतकऱ्यांना १९९ कोटी ७१ लाखांचे खरीप पीककर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने १६ हजार ५२९ शेतकऱ्यांना २९ हजार ८५७ हेक्टरसाठी १६४ कोटी ६७ लाख म्हणजेच ३२ टक्के, राष्ट्रीयीकृत बँकेव्दारा दोन हजार ७८५ शेतकऱ्यांना ३३ कोटी ६३ लाख म्हणजेच लक्षांकाच्या केवळ तीन टक्के व ग्रामीण बँकानी १५८ शेतकऱ्यांना एक कोटी ४१ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे.कर्जमाफीच्या चर्चेने जिल्ह्यातील किमान अडीच लाख शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केलेला नाही. यामुळे हे सर्व शेतकरी बँकांचे थकबाकीदार झालेत व त्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी शासनस्तरावर समितीचे गठन केले. या समितीचा अहवाल याआठवड्यात शासनाला प्राप्त होणार आहे. तोवर थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास बँकानी हात वर केले आहेत. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.वारंवार आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करणारा शेतकरी आता पुरता जेरीस आला आहे. बँकांनी कर्जवाटपाबद्दल हात वर केल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पीककर्ज न मिळाल्यास खरीप हंगाम कसा भागणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील बँकांची सद्यस्थितीजिल्ह्यात एकूण चार लाख १५ हजार ८५३ खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ९८ हजार ६०१ सभासद आहेत. यामधील एक लाख ६५ हजार ७७१ शेतकऱ्यांनी मागील वर्षी कर्ज घतले आहे. प्रत्यक्षात एक लाख ६७ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा न केल्यामुळे ते थकबाकीदार आहेत. सद्यस्थितीत तीन लाख ३३ हजार १९७ शेतकरी कर्जदार आहेत. अद्याप ६१ हजार ३८३ शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही तर १७ हजार २५७ शेतकरी अद्याप बँकांचे सभासद झालेले नाहीत.जिल्हा बँकेचा शिखर बँकेकडे २५० कोटींचा फेरकर्जाचा प्रस्तावजिल्हा बँकेला यंदा ६३१ कोटींच्या कर्जवाटपाचा लक्षांक आहे. तीन वर्षांपासून आणेवारी ५० पैशांच्या आत असल्याने पीककर्जाचे पुनर्गठन होत आहे. यंदा कर्जमाफीच्या चर्चेने कर्जवसुलीवर परिणाम झाला. त्यामुळे जे सभासद कर्जाचा भरणा करीत आहेत, त्यांनाच कर्जवाटप करण्यात येत आहे. बँकेने पीककर्ज वाटपासाठी राज्य सहकारी बँकेकडे २५० कोटींच्या फेरकर्जाचा प्रस्ताव सादर केला आहे.याप्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.