शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

रात्री ११ वाजेपर्यंत फडकला शाळेत राष्ट्रध्वज

By admin | Updated: May 3, 2015 00:29 IST

दस्तूर नगरातील महापालिका शाळेत रात्री ११ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात न आल्याने दोन मुख्याध्यापकांविरुध्द.....

दस्तूर नगरातील महापालिका शाळेतील घटना : दोन मुख्याध्यापकांविरुद्ध तिरंगा अवमानाचा गुन्हा दाखलअमरावती : दस्तूर नगरातील महापालिका शाळेत रात्री ११ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात न आल्याने दोन मुख्याध्यापकांविरुध्द फे्रजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रफुल विजय अनिलकर (२८,रा.अमरनगर) व कविता उदयसिंग चव्हाण (३८,रा.जयंत कॉलनी) अशी, मुख्याध्यापकांची नावे आहेत. महापालिकेच्या मराठी शाळा क्रमांक ११ व हिन्दी शाळा क्रमांक १३ मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. दोन्ही शाळांची इमारत एकच असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून सकाळी ७ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. इत्तमगावात ध्वजारोहण झालेच नाहीइत्तमगाव या शहिदांच्या भूमीत ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झालेच नाही. याबाबत पंचायत समिती प्रशासनाला माहिती असतानासुध्दा दुर्लक्ष केले गेले. इत्तमगाव ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनाला सचिव आणि प्रशासकाने ध्वजारोहण केले नाही. याबाबत तरुणांनी सचिवाला माहिती दिली. पण माझ्याकडे चार ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने हे शक्य होत नसल्याचे सांगून बोळवण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहन आणि ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची मुनादी देण्यात आली होती. १ मे रोजी सकाळी ग्रामवासी कार्यालयात आले. मात्र सचिव आणि प्रशासक अनुपस्थित असल्याने ध्वजारोहण झालेच नाही.ग्रामपंचायत, सेवा सोयायटीने केला अवमानभिलोना येथील ग्रामपंचायत व सेवा सोयायटीकडून १ मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात आला नाही. रात्रभर राष्ट्रीय ध्वज फडकत राहिल्याचे लक्षात येताच पथ्रोट पोलिसांनी ग्रामसेवक अवघड, चपराशी खेडकर व सेवा सहकारी सोसायटीचे सचिव रहाटे यांच्याविरुध्द ध्वज अवमानाचा गुन्हा दाखल केला. बीट जमादार संजय इंगळे, अवधूत सगणे व पुरुषोत्तम माकोडे यांनी ही कारवाई केली.