शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेला प्रारंभ

By admin | Updated: July 6, 2014 23:36 IST

राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. मात्र, पेरणीपूर्वीच या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

अमरावती : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. मात्र, पेरणीपूर्वीच या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये ६० ते ८० टक्के जोखीमस्तर आहे. पिकानुरूप दर हेक्टरी १३ हजार ते २ लाख ४२ हजार रूपयांपर्यंत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार आहे. सोमवार ७ जुलै २०१४ पासून योजनेची सुरुवात होत आहे. यापूर्वीच्या योजनेत वंचित शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै यापैकी जी तारीख आधी असेल त्या तारखेपर्यंत बँकामध्ये विमा प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.राष्ट्रीय कृषी विमा योजना रबी १९९९-२००० हंगामापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राज्यातील अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, तूर, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, सूर्यफुल, कापूस व कांदा या पिकांचा समावेश आहे. यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी या शेतकऱ्यांचे प्रस्ताव भारतीय कृषी विमा कंपनीकडे सादर करणे अनिवार्य आहे. कंपनीला वित्तीय संस्थेमार्फत प्राप्त विमा प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी विमा हप्ता जमा केल्यास त्यांना विमा संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)