शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

नदीवरच्या संकीर्ण पुलाने घेतले ३५ बळी

By admin | Updated: November 26, 2015 00:15 IST

येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत.

दर्यापूर : येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोलने झालीत, चर्चा झाली. पण, हा प्रश्न २८ वर्षांत का निकाली निघाला नाही, असा प्रश्न दर्यापूरकरांना पडला आहे. इतक्या वर्षात तब्बल ३० ते ३५ निष्पाप लोकांचे या पुलाखाली डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यासंदर्भातला प्रश्न माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला होता. तसा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंंतु नगर पालिका नाहरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगर पालिकेच्या राजकारणातच अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हा पूल व्हावा, यासाठी महाराष्ट ्रनवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत पाटील वाकोडे यांनी अनेकवेळा आंदोलनही केले. तसेच विविध पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी पुलासाठी प्रयत्न केलेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे येथे बळी जातच राहिले. पूलाची उंची कमी असल्यामुळे येथे भला मोठा डोह तयार झाला आहे. गणेश विसर्जनादरम्यान किंवा पुलावरुन पाणी सुुरु असताना पाय घसरुन अनेकांचे येथे प्राण गेले आहेत. येथे अंदाजे १०० ते २०० फूट खोल डोह असावा, असा अंदाज आहे. परंतु प्रशासनाने कधीही गाळउपसा केला नाही. तत्कालीन नगराध्यक्ष गहरवाल यांच्या काळात नगरपालिकेने पुलाची निर्मिती केली होती. पुलावरुन पाणी वाहात असताना ये-जा करु नये, असे फलकही येथे लावण्यात आले होते. परंतु बाभळी व बनोस्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने नागरिक पुलावरुन वाहत असतानाही ये-जा करतात.