शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

नदीवरच्या संकीर्ण पुलाने घेतले ३५ बळी

By admin | Updated: November 26, 2015 00:15 IST

येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत.

दर्यापूर : येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोलने झालीत, चर्चा झाली. पण, हा प्रश्न २८ वर्षांत का निकाली निघाला नाही, असा प्रश्न दर्यापूरकरांना पडला आहे. इतक्या वर्षात तब्बल ३० ते ३५ निष्पाप लोकांचे या पुलाखाली डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यासंदर्भातला प्रश्न माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला होता. तसा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंंतु नगर पालिका नाहरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगर पालिकेच्या राजकारणातच अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हा पूल व्हावा, यासाठी महाराष्ट ्रनवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत पाटील वाकोडे यांनी अनेकवेळा आंदोलनही केले. तसेच विविध पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी पुलासाठी प्रयत्न केलेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे येथे बळी जातच राहिले. पूलाची उंची कमी असल्यामुळे येथे भला मोठा डोह तयार झाला आहे. गणेश विसर्जनादरम्यान किंवा पुलावरुन पाणी सुुरु असताना पाय घसरुन अनेकांचे येथे प्राण गेले आहेत. येथे अंदाजे १०० ते २०० फूट खोल डोह असावा, असा अंदाज आहे. परंतु प्रशासनाने कधीही गाळउपसा केला नाही. तत्कालीन नगराध्यक्ष गहरवाल यांच्या काळात नगरपालिकेने पुलाची निर्मिती केली होती. पुलावरुन पाणी वाहात असताना ये-जा करु नये, असे फलकही येथे लावण्यात आले होते. परंतु बाभळी व बनोस्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने नागरिक पुलावरुन वाहत असतानाही ये-जा करतात.