शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

नदीवरच्या संकीर्ण पुलाने घेतले ३५ बळी

By admin | Updated: November 26, 2015 00:15 IST

येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत.

दर्यापूर : येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोलने झालीत, चर्चा झाली. पण, हा प्रश्न २८ वर्षांत का निकाली निघाला नाही, असा प्रश्न दर्यापूरकरांना पडला आहे. इतक्या वर्षात तब्बल ३० ते ३५ निष्पाप लोकांचे या पुलाखाली डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यासंदर्भातला प्रश्न माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला होता. तसा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंंतु नगर पालिका नाहरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगर पालिकेच्या राजकारणातच अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हा पूल व्हावा, यासाठी महाराष्ट ्रनवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत पाटील वाकोडे यांनी अनेकवेळा आंदोलनही केले. तसेच विविध पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी पुलासाठी प्रयत्न केलेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे येथे बळी जातच राहिले. पूलाची उंची कमी असल्यामुळे येथे भला मोठा डोह तयार झाला आहे. गणेश विसर्जनादरम्यान किंवा पुलावरुन पाणी सुुरु असताना पाय घसरुन अनेकांचे येथे प्राण गेले आहेत. येथे अंदाजे १०० ते २०० फूट खोल डोह असावा, असा अंदाज आहे. परंतु प्रशासनाने कधीही गाळउपसा केला नाही. तत्कालीन नगराध्यक्ष गहरवाल यांच्या काळात नगरपालिकेने पुलाची निर्मिती केली होती. पुलावरुन पाणी वाहात असताना ये-जा करु नये, असे फलकही येथे लावण्यात आले होते. परंतु बाभळी व बनोस्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने नागरिक पुलावरुन वाहत असतानाही ये-जा करतात.